सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक विद्यार्थी धडपड करत असतो. अशात नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण यामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेल्या मुलीला चक्क २१४ गुण मिळाले आहेत. यावर अनेकांनी आक्षेप घेत  सखोल चौकशीची मागणी केली आहे. सुरू असलेल्या गोंधळामुळे तलाठी भरतीची ही परीक्षा रद्द होणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. जी मुलीगी पहिली आहे तिला २१४ गुण मिळाले आहेत. याच मुलीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये ५४ गुण होते. या दोन्ही परीक्षांमध्ये फक्त १४ दिवसांचा अवधी असताना हे कसे शक्य आहे? असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे.

हेही वाचा >>> प्रेमविवाहानंतर संसार तुटण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, तीन हजार प्रेमीयुगुलांनी घेतली भरोसा सेलची मदत

Administrative approval for road works affected by heavy rain Funding in Vikramgarh Assembly Constituency Palghar
पालघर: पाऊस सर्वत्र मात्र अतिवृष्टी विक्रमगड विधानसभा क्षेत्रातच !
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Bhayandar, Shiv Sena Thackeray group, Clash Between Two Women Leaders, fight, viral video,
Video: भाईंदरमध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी
Krushi Sevak, Krushi Sevak posts,
मोठी बातमी! २५ ऑगस्टच्या परीक्षेत कृषी सेवकांचा २५८ पदांच्या समावेशासंदर्भात महत्त्वाचा….
Javelin thrower Neeraj Chopra opinion on 90 m distance debate sport news
अंतराबाबतची चर्चा आपण देवावर सोडूया! ९० मीटरच्या टप्प्याबाबत भालाफेकपटू नीरज चोप्राचे मत
MS Dhoni IPL salary
MS Dhoni IPL 2025 : माहीच्या मानधनात तीन पटीने होणार कपात? आयपीएलच्या ‘या’ नियमामुळे कोट्यवधींचा बसणार फटका
chhattisgarh woman murdered
Chhattisgarh : महिलेच्या ‘या’ तगाद्यानं घटस्फोटित पती अन् प्रियकर वैतागला, दोघांनी ‘दृष्यम’ चित्रपट पाहिला अन्…; खळबळजनक घटना समोर
Manish Sisodia AAP Aam Aadmi Party Delhi liquor scam
मनीष सिसोदियांना मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी मंजूर झालेला जामीन ‘आप’साठी इतका महत्त्वाचा का आहे?

तलाठी भरतीच्या या परीक्षेत मोठा घोटाळा होणार हे आम्ही आधीच सांगितले होते. यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात देखील याचिका केली आहे. यावेळी मोठी पेपर फुट देखील झाली, गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र कसलाही तपास न करता पेपर घेण्यात आले आहेत. सरकारने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे. त्यातच आता या संघटनेने तलाठी भरती संदर्भात मोठी माहिती आपल्या ट्विटरवर जाहीर केली आहे. लातूरमधील तलाठी घोटाळा बाबत धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. काही जिल्ह्यातील टॉपर मुले ज्यांना २०० पेक्षा अधिक गुण आहेत ते एकाच गावचे आहेत. शिवाय ते लातूर मधील एका परीक्षा केंद्र चालकाचे नातेवाईक असल्याचा व   शिवाय वनरक्षक भरतीमध्येही हेच परीक्षा केंद्र देण्यात आले होते असा आरोप आहे. या सर्व प्रकारामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. असेच प्रकार प्रत्येक जिल्ह्यात झाले आहेत. हे फक्त उदाहरण आहेत. जर लातूरमधील केंद्रांची उच्चस्तरीय चौकशी झाली तर सर्व सत्य समोर येईल. गरिबांच्या होतकरू मुलांनी फक्त अभ्यासच करायचा का?  सरकार डोळे उघडा आणि चौकशी करा सत्य समोर येईल अशी मागणीही समन्वय समितीने केली आहे.