नागपूर : उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहे असे वक्तव्य केले होते. ते योग्यच आहे. भाजपा आता कलंक या शब्दावरून आंदोलन करीत असेल तर त्यांच्या नेत्यांची यापूर्वीची वक्तव्ये तपासून घ्यावी व त्यांच्या विरोधात आंदोलन करावे, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

हेही वाचा – घरातील डास, झुरळांच्या समस्येने त्रस्त आहात, मग ‘हा’ घरगुती उपाय कराच…

beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
intra party discord seen during protest against ec organized by pune congress
काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते वेठीला? शहरातील पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली

अतुल लोंढे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांची भाषा काय आहे. तेसुद्धा टीका करताना कुठली भाषा वापरतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेमधील भाषा, राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर भाषणातील भाषा कशी असते याचेही भाजपाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. काँग्रेसकी विधवा, सोशल मीडियाची बारबाला अशी विधाने भाजपाच्या प्रवक्त्यांनी केली आहेत. मात्र त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. भाषा आणि राजकीय संस्कृती खराब करण्याचे काम हे भाजपाने केले आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यासाठी कलंक हा शब्द योग्य असल्याची टीका लोंढे यांनी केली.

Story img Loader