नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देताना ते वेगळ्या प्रवर्गातून देण्याची सरकारची भूमिका असल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. मात्र त्यानंतर काँग्रेसचे नेते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यामुळे मराठा व ओबीसी समाजाचा काँग्रेसवर विश्वास राहिलेला नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

बावनकुळे यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना झाल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ओबीसी महासंघाने आंदोलन आणि मोर्चा काढला असून त्यात भाजपसह सर्वपक्षीय नेते होते. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सर्वपक्षीय बैठकीत ठरले आहे आणि सरकारने त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या आंदोलनाला सर्व पक्षाच्या नेत्यांनी समर्थन केले आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल मात्र त्यात ओबीसीचे आरक्षण कमी होणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमीच जनतेची दीशाभूल करत असतात. विकास कामावर चर्चा करण्यापेक्षा दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करतात.

Tribal Reservation Rights Action Committee warns the state government
धनगरांना आरक्षण दिले तर ८५ मतदार संघात भूमिका घेऊ, आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : लोकशाहीत टीका अविभाज्य घटक
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”
Petitioners against reservation of Maratha society claim in High Court Mumbai news news
मराठा समाजाचे मागासलेपण स्वयंघोषित; आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा
Maratha community cannot be said to be backward due to high rate of suicide
मुंबई : आत्महत्येचे प्रमाण अधिक म्हणून मराठा समाजाला मागास म्हणू शकत नाही
Ladki Bahin Yojna
लाडकी बहीण योजना अन् महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये; सरकारच्या योजनेतून मतांची पेरणी?
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश

हेही वाचा >>> खासदार नवनीत राणांची मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार; ‘कडक नोटा’ प्रकरणी…

महिलांच्या आरक्षणाबाबत काँग्रेसने कधीही प्रयत्न केले नाही. महिला आरक्षणाबाबत विधेयक मांडून नवा इतिहास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडविला. हे विधेयक मंजूर झाल्यावर देशातील निम्म्या संख्येत असलेल्या महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळेल व त्या देखील देशाच्या जडण-घडणीत हातभार लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सामाजिक एैक्याची व समाज प्रबोधनाची, राष्ट्रभक्तीची, गौरवशाली एतिहासिक परंपरा आहे. ही परंपरा पुढे नेताना नागरिकांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गणेशोत्सव साजरा करावा असेही बावनकुळे म्हणाले.