नागपूर: काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी शनिवारी नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, आम्ही अदाणी प्रकरणी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी केली. सरकारने या समितीला घाबरण्याचे काहीच कारण नाही. लोकसभेत भाजपचे सदस्य जास्त आहेत. त्यामुळे साहजिकच जेपीसीमध्ये सुद्धा अर्ध्याहून अधिक खासदार त्यांचेच असणार आहेत. परंतु पंतप्रधान मोदी आपल्या पक्षाच्या खासदारांना घाबरताना दिसतात. त्याचे कारण भाजप खासदारांमध्ये मोदींबाबत रोष आहे.

हेही वाचा >>> नवीन संसदेच्या उद्घाटनासाठी ओवैसींचा मोदींना पाठिंबा, पण घातली ‘ही’ एकच अट….!

cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा
supriya sule latest news
“असंविधानिक पदनिर्मितीत महाराष्ट्र सर्वांत पुढे”, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
loksatta editorial on devendra fadnavis
अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!

हे सगळे खासदार आपल्याला घरी बसवतील, असे मोदींना वाटत असावे. याही पुढे जाऊन मोदी नेमके कोणाला घाबरतात हे मी सांगणार होतो. पण, जाऊ द्या त्यांचा आज वाढदिवस आहे. गौरव वल्लभ म्हणाले, अदाणी समूहाच्या व्यवहाराबाबत अमेरिकेतील हिंडेनबर्ग संशोधन संस्थेने अहवाल आल्यापासून काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी करीत आहेत. परंतु केंद्र सरकार ते मान्य करीत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि अदाणी यांची मैत्री असल्याचा आरोप केला होता. सर्वोच्च न्यायालायने या प्रकरणात नियुक्त केलेल्या समितीला प्रथमदर्शनी अदाणी समूहाच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. यावर विचारलेल्या प्रश्नावरून गौरव वल्लभ म्हणाले, प्रत्येक गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणे अयोग्य आहे. लोकशाहीमध्ये संसद सर्वोच्च आहे.

Story img Loader