अकोला : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलेल व आरक्षण रद्द करेल, अशी अफवा काँग्रेसकडून सातत्याने पसरवली जाते. मात्र, संविधान कोणीही बदलू शकत नाही. भाजप असेपर्यंत एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द होणार नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. भाजपने १० वर्षांत बहुमताचा वापर दहशतवाद, कलम ३७०, तिहेरी तलाक, आदी हटविण्यासाठी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> “देशभरात सत्तेचा गैरवापर सुरू, अशा पद्धतीची दडपशाही…” आमदार यशोमती ठाकूर यांचा भाजपवर आरोप

BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
vijay wadettiwar on deepak kesarkar
Vijay Wadettiwar : “शिवरायांचा पुतळा अपघाताने कोसळला” म्हणणाऱ्या दीपक केसरकरांवर विजय वडेट्टीवारांचं टीकास्र; म्हणाले, “अपघाताने आलेल्या सरकारचं…”
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
kiren rijiju criticized rahul gandhi
Kiren Rijiju : “बालबुद्धी मनोरंजनासाठी चांगली आहे, पण…” राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावरून किरेन रिजिजूंची खोचक टीका!

अकोला मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भावना गवळी, प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, डॉ. उपेंद्र कोठीकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. अमित शहा यांनी आपल्या भाषणात काँग्रेससह शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘इंडिया’ आघाडीचा राम मंदिराला विरोध होता. काँग्रेसने ७० वर्ष हा प्रश्न रेंगाळत ठेवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० वर्षांत हा प्रश्न मार्गी लावून भव्य राम मंदिर उभारले. भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था येईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> गडकरींच्या प्रचारात शाळकरी मुलांचा सहभाग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

काश्मीरचे महाराष्ट्रातील जनतेला काय देणे घेणे, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी केले. काश्मीरसाठी जीव देऊ शकतो, याची त्यांना कल्पना नाही. मोदींनी कलम ३७०, तिहेरी तलाक, दहशतवाद, महाराष्ट्रातील नक्षलवाद संपवण्याचे काम केले. काँग्रेसच्या सरकारमध्ये शरद पवार दहा वर्ष मंत्री होते, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा प्रश्न निर्माण होतो. १० वर्षात काँग्रेसने एक लाख ९१ हजार कोटी दिले, तर मोदी सरकारने ७ लाख १५ हजार कोटी रुपये महाराष्ट्राच्या विकासासाठी दिले आहेत. पुत्रप्रेमात असलेल्या उद्धव ठाकरेंविषयी बोलणार नाही, असा टोला देखील शहा यांनी लगावला. महाराष्ट्रातील अर्धी शिवसेना व राष्ट्रवादी आणि त्यांच्यामुळे निम्म्यावर आलेले काँग्रेस विकास करू शकत नाही, अशी टीका अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर केली. दरम्यान, सभेमध्ये अवकाळी पावसाचा व्यत्यय आल्यानंतर ही मोठा जनसमुदाय उपस्थित होता.