लोकसत्ता टीम

गडचिरोली : सरकारी नोकरभरती बंद करून १३७ संवर्गातील शासकीय नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने बाह्य स्त्रोतांच्या कंपन्यांमार्फत भरल्या जाणार आहेत. या कंपन्या भाजप नेत्यांच्या आहेत, असा आरोप माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांनी केला.

Why change in sugar control order is needed after 58 years
साखर नियंत्रण आदेशात ५८ वर्षांनी बदलाची गरज का? नवीन तरतुदी काय आहेत?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
maharera issue model guidelines to regulate senior citizen housing projects
ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माणासाठी विकासकांना चटईक्षेत्रफळात सवलत! राज्याकडून मसुदा जाहीर; हरकती-सूचनांसाठी २१ सप्टेंबरपर्यंत मुदत
Chief Justice Dhananjay Chandrachud asserted that a three tier scheme would soon be in place for the disposal of cases
खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी लवकरच त्रिस्तरीय योजना; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक
Why did SEBI ban Anil Ambani from trading in the capital market for five years
‘सेबी’ने अनिल अंबानींवर भांडवली बाजारात व्यवहारास पाच वर्षांची बंदी का घातली?
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
Mumbai, Capital Markets, Stock Indices, Sensex, Nifty, Federal Reserve, Jerome Powell, Jackson Hole Meeting, Domestic Institutional Investors, Foreign Institutional Investors,
तेजीवाल्यांची पकड घट्ट; ‘सेन्सेक्स’मध्ये शतकी वाढ

आणखी वाचा-Monsoon Update: मान्सूनच्या परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून

गडचिरोली येथे गुरुवारी कुणबी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभाग दर्शविण्यासाठी ते गडचिरोली येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधला. बिहार राज्याने जातनिहाय सर्वेक्षण केले आहे, असे सर्वेक्षण महाराष्ट्राने करावे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अन्यथा समाजात तेढ निर्माण होऊ शकते, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, संजय ठाकरे, विजय गोरडवार, रमन ठवकर, राजेंद्र वैद्य आदी उपस्थित होते.

धर्मरावबाबांना मंत्री बनायचेच होते

ईडीचा धाक दाखवत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडले. मात्र अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांना ईडीचा धाक दिला नव्हता. त्यांना मंत्री बनायचे होते. त्यामुळे ते भाजप सरकारमध्ये सहभागी झाले.