यवतमाळ : शासनाच्या वतीने निधीची तरतूद नसताना एकाचवेळी तब्बल ९० हजार कोटी रुपये किमतीची कामे काढून त्याच्या निविदा प्रक्रिया राबवल्या. मात्र ही कामे करणाऱ्या कंत्राटदारांना गेल्या अडीच वर्षांपासून निधीच दिलेला नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीत राज्यातील कंत्राटदारांची सुमारे २६ हजार कोटी रुपयांची देयके शासनाकडे प्रलंबित आहेत. प्रलंबित निधी मिळण्यासाठी राज्यभरातील कंत्राटदारांनी संघटित होत आंदोलन पुकारले आहे. सोमवारी यवतमाळात झालेल्या बैठकीत, राज्यातील कंत्राटदारांनी प्रलंबित देयके न मिळाल्यास येत्या १ मार्चपासून राज्यात सुरू असलेली सर्वच कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने गेल्या तीन वर्षापासून ९० हजार कोटी रुपयांची देयके थकवली आहेत. त्यामुळे प्रलंबित देयके मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय कंत्राटदारांनी बैठकीत घेतला. मार्चअखेरपर्यत देयके न दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा