‘पालिका व प्रन्यासमधील अनेक अधिकाऱ्यांना लक्ष्मीदर्शनाशिवाय काम न करण्याची सवयच जडली आहे. अशांच्या छातीवर बसून रगडा व कामे करून घ्या किंवा आपल्याकडे तक्रारी करा, त्यांना उभ्याने ठोकून काढू’ हे विधान कोणत्याही स्थानिक नेत्याचे नाही, तर भक्कम जनसमर्थन लाभलेल्या केंद्रीय मंत्र्यांचे आहे. उपराजधानीचे खासदार व केंद्रात मंत्री असलेले नितीनभाऊ गडकरी हे अघळपघळ बोलण्यासाठी ज्ञात आहेत. खास वऱ्हाडी शैलीतील त्यांचे हे बोलणे सामान्य जनतेला अनेकदा आवडून जाते. म्हणून गडकरी जाहीरपणे असे बोलतात का?, हा अनेकांना पडलेला प्रश्न. सामान्य जनता भ्रष्टाचाराने नेहमीच त्रस्त असते. त्यामुळे या मुद्यावर एखादा बडा नेता बोलायला लागला की, जनतेला वाटते हा आपल्या मनातीलच बोलत आहे. लोकांची मने जिंकण्यासाठी अशी भाषा व वाक्ये कामी येतात. नेमका हाच हेतू तर गडकरींच्या या विधानामागे नसेल ना, अशी शंका घ्यायला भरपूर जागा आहे. मात्र, गडकरींच्या या विधानाचे विश्लेषण सामान्य जनता करीत नाही. ते त्यांचे कामही नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा