जामठ्यात गुरुवारपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी नागपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. जवळपास ३ हजार पोलीस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले आहेत. तसेच क्रिकेट सामना बघायला गर्दी उसळणार असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि वाहतूक उपायुक्तांनी जामठा मैदानाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.

हेही वाचा >>>राष्ट्रीय महामार्ग सहावरील उपशमन योजना १५ वर्षांपासून प्रलंबित, वाघाचा अपघाती मृत्यू थोडक्यात टळला

vasai virar gold loksatta news
वसई : पोलिसांच्या तपासावर सराफाचे प्रश्नचिन्ह, लुटीतील उर्वरित ६०० ग्रॅम सोने गेले कुठे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
baheliya gang hunted more than 25 tigers in maharashtra in two years
दोन वर्षांत २५ वाघांची शिकार; बहेलिया टोळीच्या राज्यात कारवाया
Vijay Ghaywat, jail, Nagpur, loksatta news,
नागपूर : विकृत विजय घायवटची पुन्हा कारागृहात रवानगी
Police detained three Bangladeshis living illegally in Bhiwandi for 15 years
भिवंडीतून तीन बांगलादेशींना ताब्यात, बनावट आधारकार्डासह शिधापत्रिका, पॅनकार्ड जप्त
debt collectors false case news in marathi
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेड्या
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
pune municipal corporation winding road from siddhivinayak college to cummins college
कमिन्स महाविद्यालयाजवळील वाहतूक कोंडी सुटणार ? अडथळा ठरणारी भिंत तसेच दुकाने महापालिका प्रशासनाने काढली

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान विदर्भ क्रिकेट एसोसिएशनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ चार दिवसांपूर्वीच नागपुरात दाखल झाले आहेत. खेळाडूंची आणि मैदानावरील सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सशस्त्र जवानाच्या तुकड्यांसह साध्या वेशातील पोलिसांचा ताफासुद्धा सज्ज आहे. वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालवाहू वाहनांना सामन्याच्या वेळेत तात्पुरती प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. पाच दिवस वाहतुकीच्या व्यवस्थेत बदल होणार आहे. हैदराबाद-वर्धा मार्गावरील जड वाहतूक डोंगरगाव टोल नाका येथे थांबवण्यात येत आहे. कामठी, भंडारा रोडवरील वाहतूक पांजरी टोल नाक्यावर तर अमरावती रोडवरून येणारी वाहतूक नॅशनल कॅन्सर इन्ट्यिट्यूट फाट्यावर थांबवण्यात येत आहे.

Story img Loader