गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून यामुळे सात तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मेहकर व लोणार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने दाणादाण उडविली असून खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.यंदाचा नियमित पाऊस पावसाळ्याच्या उत्तरार्धात खरीप पिकांचे नुकसान करणारा ठरला. याउपरही खरीप पिके तग धरून होती. जिल्ह्यातील सुमारे ४ लाख हेक्टरवर पेरा झालेल्या सोयाबीनवर लाखो शेतकऱ्यांच्या आशा अवलंबून असताना ऑक्टोम्बरमध्येदेखील पावसाचे थैमान कायम आहे. मागील आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस व ढगाळ वातावरण पिकांसाठी मारक ठरत आहे.

हेही वाचा >>>नागपूर : तरुणीने करमत नसल्यामुळे कंटाळून घेतला गळफास

parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Sateli Gram Sabha unanimously passes resolution to ban mining
साटेली मायनिंग उत्खनन नियम धाब्यावर बसविले, ग्रामसभेत मायनिंग उत्खनन बंदचा एकमताने ठराव मंजूर!
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
Cotton production, Cotton bales, textile industry,
कापूस उत्पादन ३०४ लाख गाठींवर जाणार, कापड उद्योगाला मोठा दिलासा; जाणून घ्या कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाचा अंदाज
kolhapur tamdalge village ropvatika
लोकशिवार : रोपवाटिकेचे गाव!

परतीच्या पावसात अतिवृष्टी!
परतीच्या पावसात अतिवृष्टी हे दुर्मिळ चित्र मेहकर व लोणार तालुक्यात अनुभवाला मिळाले. १० ऑक्टोबरला सकाळी ८.३० वाजतापर्यंत (२४ तासांत) मेहकर तालुक्यातील मेहकर व नायगाव महसूल मंडळात प्रत्येकी १०७.५ मिलीमीटर इतका कोसळधार पाऊस झाला. लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळाला १०५ मिलीमीटर इतक्या धोधो पावसाने झोडपून काढले. यामुळे उभी पिके अक्षरशः आडवी झाली.

हेही वाचा >>>नागपूर : मंदिरात दर्शन घेत माफी मागितली आणि हनुमानाची गदा घेऊन पसारही झाला

जिल्ह्यात ९५ टक्के पाऊस परतीच्या पावसाने १३ तालुक्यातील पावसाची आकडेवारीदेखील सुधारली आहे. बुलढाणा व देऊलगावराजा प्रत्येकी १०७ मिमी, सिंदखेडराजा १०४, मेहकर १००, शेगाव १०१, संग्रामपूर १०४ या तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित ७ तालुक्यात ८० ते ९८ टक्केदरम्यान पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या ( ७६१. ६ मिमी) तुलनेत आजअखेर ७२२ मिमी( ९४.८८ टक्के) इतका पाऊस बरसला.

हेही वाचा >>>नागपूर : शरीरसंबंधास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची तरुणाची मैत्रिणीला धमकी

दुसरीकडे, अतिवृष्टीमुळे ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान म्हणजे केवळ ३ दिवसातच तब्बल १९ हजार ६५ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर, उडीद या पिकासह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील २७ गावातील ११०३५ हेक्टरवरील तर लोणार तालुक्यातील ५ गावांतील ८०३० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संतोष डाबरे यांनी सांगितले.

Story img Loader