लोकसत्ता टीम अकोला : आंध्र प्रदेश येथील चक्रीवादळ ‘मिचौंग’चा रेल्वेला देखील फटका बसत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनकडून काही प्रवासी रेल्वे गाडी रद्द करण्यात येत आहे. यामध्ये भुसावळ विभागातील नवजीवन एक्सप्रेस रेल्वेगाडीचा समावेश आहे. तीन दिवस नवजीवन एक्सप्रेस धावणार नाही. आणखी वाचा-मध्य प्रदेशातील भाजप विजयात अकोल्याचा वाटा, जाणून घ्या सविस्तर… आंध्र प्रदेशमध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे. रेल्वेने अनेक प्रवासी गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामध्ये भुसावळ विभागातून धावणारी नवजीवन एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. गाडी क्रमांक १२६५६ चेन्नई - अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस ०३ ते ०५ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२६५५ अहमदाबाद - चेन्नई नवजीवन एक्सप्रेस ०४ ते ०६ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. या गाडीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची ऐनवेळी चांगलीच अडचण होणार आहे.