वर्धा: सलग ४० दिवस जिल्ह्यात  संततधार  पडली. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र होते. तसेच शेतात पाणी साचल्याने हजारो हेक्टरवरील पिके वाया गेली आहे. थांब रे बाबा आता, अशी विनवणी शेतकरी करीत असल्याचे पाहायला मिळते. मात्र रविवारी रात्री काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून आज सकाळपासून ढगाळ वातावरण दाटून आले आहे. या दोन दिवसात वृष्टी झाल्यास काही भागात पूर येण्याची शक्यता व्यक्त होते.

जलाशये  १०० टक्के

जिल्ह्यातील बहुतांश धरणात क्षमते एव्हढा पाणी साठा झाल्याची आकडेवारी आहे. पोथरा, पंचधारा, डोंगरगाव, मदन, उन्नई, सुकळी , कार प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर लाल नाला, धाम, नांद, वडगाव, अप्पर वर्धा ही धरणं ९५ टक्के पाणीसाठ्यावर गेली आहेत.मंजूर मर्यादेपेक्षा पाणी साठा अधिक झाल्याने धरण सुरक्षा म्हणून आज सकाळी सहापासून बोर प्रकल्पचे सर्व पाच दरवाजे बंद करण्यात आले आहे. नदीपात्रात विसर्ग बंद करण्यात आल्याने नदी काठच्या गावांना सावध करण्यात आले आहे. डोंगरगाव धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. निम्न वर्धा धरण क्षेत्रात रात्री पाऊस झाल्याने खबरदारी म्हणून विसर्ग बंद करण्यात आला आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
beggars Nagpur, beggars luxury bus,
नागपुरात भिकारी गोळा केले… आलिशान गाडीत बसवले आणि थेट…
Death mother daughter Gondia, snake bite Gondia,
गोंदिया : सर्पदंशाने मायलेकींचा मृत्यू
hundred percent water storage in Ujani dam in Solapur district
उजनी धरणाचे पाणी अखेर कुरनूर धरणात पोहोचले; अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७२ गावांना होणार लाभ
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
Petition in court against Nitin Gadkaris ministry about loss of one lakh crores to the country
नितीन गडकरींच्या मंत्रालयामुळे देशाला एक लाख कोटींचा तोटा? न्यायालयात याचिका… काय आहे कारण?
Tandoba Andhari Tiger, tigress did hunting,
VIDEO : अवघ्या काही महिन्याच्या वाघिणीने केली शिकार, पण..

हेही वाचा >>>VIDEO : अवघ्या काही महिन्याच्या वाघिणीने केली शिकार, पण..

सर्व लघु प्रकल्प ओव्हरफ्लो

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लघु प्रकल्प असून सर्वच ठिकाणी सांडव्यावरून पाणी वाहू लागत आहे. कवाडी, सावंगी, लहादेवी, अंबाझरी, पांजरा, उमरी, टेम्भू्री, बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुऱ्हा, रोठा एक व दोन, आष्टी, पिलापूर, कन्नमवारग्राम, परसोडी, मलकापूर, हराशी टाकली, शिरुड हे लघु प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहे.

१० जुलै पासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. काही अपवाद वगळता जुलै पूर्ण महिना तसेच ऑगस्टमध्ये २० दिवस तर सप्टेंबरच्याही पहिल्या आठवड्यात दमदार वृष्टी झाल्याची नोंद आहे. नदी नाल्यांना  पूर आल्याने काही रस्ते पूर्णतः उखडले आहेत. तसेच गावनाल्यावरील  छोटे पूल खचून पडले. पुरात चार व्यक्ती वाहून गेल्यात त्यांचे शव तब्बल ४८ तासांनी हाती लागले. बचाव पथकच्या तीन चमू वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. हिंगणघाट, सेलू, समुद्रपूर, आर्वी, देवळी या तालुक्यातील असंख्य गावात पुराचे पाणी साचले असल्याने ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी होत आहे.