नागपुरातील पूरस्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. नागपुरात कमी वेळत १०९ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली. त्यातील ९० टक्के पाऊस हा फक्त दोन तासांत पडला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. यात तीन लोकांचा आणि १० जनावरांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

“नागनदीच्या भिंती पडल्यानं नुकसान झालं आहे. लोकांच्या घरात पाणी गेल्यानं गाळ आणि चिखलाची परिस्थिती झाली आहे. अनेक लोकांना स्थलांतरीत केलं असून, जवळपास १० हजार घरांमध्ये पाणी शिरलं आहे. झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गाळ घरांमध्ये गेल्यानं लोकांना अन्नधान्य फेकून द्यावं लागलं आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं.

Bihar hooch Tragedy
Bihar Hooch Tragedy : दारूबंदी असलेल्या राज्यात विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव, घराघरांत मृतदेह, अनेकांनी दृष्टी गमावली; बिहारमध्ये नेमकं काय घडलं?
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
navneet rana received threat letter
धक्कादायक! भाजपा नेत्या नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचाराची धमकी; हैदराबादवरून आलं निनावी पत्र
maharashtra dcm devendra fadnavis praises pune police for investigation in bopdev ghat gang rape case
पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण; तपासाबाबत गृहमंत्र्यांकडून पुणे पोलिसांचे कौतुक
Rajasthan elderly couple suicide
उपाशी ठेवून भीक मागायला सांगितलं, पोटच्या मुलांकडून संपत्तीसाठी आई-वडिलांचा छळ; वृद्ध दाम्पत्यानं जीवन संपवलं
girl claims she raped by two by giving intoxication substance
गुंगीचे औषध देऊन दोघांनी बलात्कार केल्याचा तरूणीचा दावा; तपासणीत आरोपांना अद्याप पुष्टी मिळालेली नाही, एकाला अटक
chembur chawle fire
चेंबूरच्या आगीत माणुसकीही झाली खाक, चोरट्यांनी उद्ध्वस्त घरात डल्ला मारत १२ लाखांचा ऐवज चोरला
sanjay shinde who killed akshay shinde in an encounter get discharged from hospital
अक्षय शिंदे याला चकमकीत ठार करणाऱ्या संजय शिंदे यांना डिस्चार्ज

हेही वाचा : दर्जाहीन कामामुळे पुराचा तडाखा

“महापालिका गाळ काढण्यास मदत करणार”

“घरात पाणी शिरलेल्यांना १० हजारांची मदत तातडीनं देण्यात येणार आहे. तर, दुकानांना ५० हजार आणि हातगाडीवाल्यांनाही १० हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. महापालिका गाळ काढण्यास मदत करणार आहे,” असं फडणवीसांनी म्हटलं.

हेही वाचा : नागपूर: लष्कर धावले मदतीला

“सगळ्या परिस्थितीकडं प्रशासनाचं लक्ष”

“चिंतेची बाब एवढीच की रात्री ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे एनडीआरफ, एसडीआरफ आणि लष्कराच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. सगळ्या परिस्थितीकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, तेवढा आमचा प्रयत्न असणार आहे,” असं फडणवीस म्हणाले.