उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरातील पूरस्थितीची पाहणी केली आहे. शहरातील जवळपास जवळपास दहा हजार घरांचं नुकसान झालं आहे. पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर फडणवीसांनी नुकसानभरपाई करण्याबाबत विधान केलं आहे. लोकांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, तेवढी मदत आम्ही करू. लोकांच्या घरातील चिखल काढण्याचं काम सुरू केलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की, भविष्यात एवढं पाणी आल्यानंतर किमान ते घरांमध्ये शिरणार नाही, त्यादृष्टीने आपल्याला काम करावं लागेल. काही नाल्याच्या आणि नाग नदीच्या भिंती तुटलेल्या आहेत. त्या भिंती तयार कराव्या लागतील. अंबाझरीच्या संदर्भात मी काल बोललो आहेच. या तलावाचा जो ‘ओव्हर फ्लो पॉइंट’वर आपल्याला पायाभूत सुविधांचं काम करावं लागेल. ते काम करण्याचा विचार राज्य सरकार करेल.”

Sharad Pawar Statement About Jayant Patil
Sharad Pawar : जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार? देवेंद्र फडणवीसांच्या आव्हानानंतर शरद पवारांचं सूचक विधान
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
national icon Ratan Tata
रतन टाटा यांना भावपूर्ण निरोप, अंत्यदर्शनासाठी सर्वसामान्यांची रीघ
Union Minorities Minister Kiren Rijiju stance on ministership to Muslim community Pune news
भाजपला मतदान केल्यावरच मुस्लिम समाजाला मंत्रिपद; केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांची भूमिका
Former Congress president Manikrao Thackeray criticizes Prime Minister Narendra Modi regarding insult to the Banjara community
यवतमाळ: पोहरादेवीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बंजारा समाजाचा अपमान; माणिकराव ठाकरे यांची टीका
pm narendra modi slams maha vikas aghadi in thane
Narendra Modi In Thane : महाविकास आघाडी विकासाचा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकास्त्र
Narendra Modi Thane, Narendra Modi Ghodbunder,
विकासशत्रू महाविकास आघाडीला रोखा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Devendra Fadnavis believes that farmer suicides can be prevented only through water conservation
जलसंवर्धनातूनच शेतकरी आत्महत्या रोखणे शक्य, देवेंद्र फडणवीस यांचे मत

हेही वाचा- नागपूर : केअर रुग्णालयातील ७० रुग्ण इतरत्र हलवले; पावसाचा तडाखा, धावाधाव

नुकसानभरपाईबाबत फडणवीस म्हणाले, “लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हे दु:ख सहन करणं त्यांना कठीण आहे. आपण देखील बघितलं असेल, लोक रडकुंडीला आल्यासारख्या त्यांच्या प्रतिक्रिया देत होते. त्यांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, तेवढा आमचा प्रयत्न असेल.”

हेही वाचा- नागपुरातील पुरात नुकसान झालेल्यांना फडणवीसांकडून मदतीची घोषणा; म्हणाले, “चिंतेची बाब एवढीच की…”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, शहरात सुमारे दहा हजार घरांचं नुकसान झालं आहे. लोकांच्या घरात चिखल आहे. तो चिखल काढण्यासाठी काम सुरू केलं आहे. लोकांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यासही सांगितलं आहे. तसेच लोकांना पूर्ण साफसफाई करण्यास मदत करू.