वर्धा : शनिवारपासून (४ जून) बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मित्रांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने आर्वी शहरात शोककळा पसरली आहे. देवांश नीलेश घोडमारे (१४, आसोलेनगर) व युगंधर धर्मपाल मानकर (१५, साईनगर) अशी मृतांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवांश आणि युगंधर शनिवारी दुपारी पाच वाजता खेळायला जातो म्हणून घराबाहेर पडले, मात्र रात्र होऊनही घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. मुलांचा थांगपत्ता लागत नसल्याने पालकांनी पोलिसांत तक्रार केली. दरम्यान, शहापूर शिवारातील राजेश गुल्हाने यांच्या शेतातील शेतमजुराला विहिरीत दोन मृतदेह आढळले.

हेही वाचा : लातूरमध्ये लग्नाला आलेल्या वऱ्हाडावर कोसळला दुःखाचा डोंगर, सख्ख्या भावांसह तिघांचा बुडून मृत्यू

पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. दोघांचेही कपडे, सायकल व चप्पल विहिरीच्या काठावर आढळून आल्यामुळे ही मुले पोहण्यासाठी विहिरीत उतरल्याची व त्यातच घात झाल्याची शंका व्यक्त होत आहे. दोघेही नवव्या वर्गात शिकत होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of two minor boys by drowning in well in wardha pbs