नागपूर : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊन आता बराच काळ लोटला आहे. निवडणूक झाली, निकाल आली आणि बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाली. निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी विशेषत: विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक दिग्गज निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले. कॉँग्रेससह शिवसेना-ठाकरे गट आणि राष्ट्रवादी-शरद पवार गट यांनी भाजपसह इतर विजयी उमेदवांराच्या विजयावर सवाल उपस्थित केला. काही कॉँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी तर थेट उच्च न्यायालयात निवडणुक याचिका दाखल करत निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी केली. मात्र पराभूत कॉँग्रेस उमेदवारांच्या या गर्दीत भाजपच्या एका पराभूत उमेदवाराने कॉँग्रेसच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि कॉँग्रेसने डबल व्होटिंग करत विजय प्राप्त केल्याचा आरोप केला. न्यायालयाने याप्रकरणी कॉँग्रेसच्या विजयी उमेदवाराला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा