कर्जत, नागपूर : महायुतीमध्ये एकत्र बसून जागावाटपाची चर्चा केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये स्पष्ट केले असतानाच बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या गेल्या वेळी जिंकलेल्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी परस्पर जाहीर करून टाकले. बारामती मतदारसंघ लढण्याचे जाहीर करून अजित पवार यांनी काका शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हानच दिले आहे.

महायुतीत भाजप २६, तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट उर्वरित २२ जागा लढवतील, असे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये केले होते. त्यावर शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रतिक्रिया उमटल्यावर फडणवीस यांनी जागावाटप अद्याप अंतिम झालेले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, भाजपचा एकूणच सूर फडणवीस यांच्या विधानातून स्पष्ट झाला.

shrikant shinde
कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्याकडून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर

 या पार्श्वभूमीवर कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन बैठकीत बोलताना अजित पवार यांनी बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या गेल्या वेळी राष्ट्रवादीने जिंकलेल्या चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे जाहीर केले. महायुतीमधील जागावाटप अद्याप अंतिम झालेले नसताना अजित पवार यांनी परस्पर जागावाटपाचे सूत्र जाहीर केले.

हेही वाचा >>>पोषण आहारात अंडी नको! ‘या’ संघटनांचा वाढता विरोध, ‘हे’ सुचविले पर्याय…

२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला होता. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही आम्ही तटस्थ राहून भाजपला मदत केली होती. त्यामुळे आता काही खूप वेगळे केले असे नाही. भिन्न विचारसरणी असलेले पक्ष एकत्र आल्याची देशात अनेक उदाहरणे आहेत. ममता बॅनर्जी, मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला नितीश कुमार यांनीही भाजपशी युती केली होती. त्यांनी आपल्या पक्षाचा विचार सोडला नाही. आम्हीपण विचार सोडणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

‘जातनिहाय जनगणना व्हावी’

मराठा समाजाला आरक्षण मिळाले, पाहिजे याबाबत दुमत नाही. पण ते देताना इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का लागायला नको. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करूनच कार्यवाही व्हायला हवी. मागासवर्ग आयोगाचा अभ्यास, जुने अभिलेख, शिंदे समितीचा अहवाल या सर्व बाजूही महत्त्वाच्या असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना व्हायला हवी. विविध राजकीय पक्षांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आमची चर्चा झाली आहे, असे पवार यांनी सांगितले.

बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या चारही जागा निवडून आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न आम्ही करणार आहोत. भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार नसलेल्या काही जागा लढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तिन्ही घटक पक्ष बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेतील. अतिशय सामोपचाराने जागावाटप होईल.-अजित पवार, उपमुख्यमंत्री

Story img Loader