प्रमोद खडसे

वाशीम : यावर्षी सोयाबीन पिकावर पिवळा मोझ्याक पडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारने मागील मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी येथे दिली. परंतु सोयाबीन काढणी संपण्याच्या मार्गावर असताना सरकार पंचनामे कसे करणार व मदत कधी मिळणार? यावरून शेतकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे.

Udayanidhi Stalin become deputy chief minister
Udhaynidhi DCM : तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; उदयनिधी यांची उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती, तर तुरुंगातून सुटून आलेल्या नेत्यालाही मंत्रीपदाची माळ!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
the cabinet is angry at the behavior of the officials Mumbai
अधिकाऱ्यांच्या चालढकलीवर मंत्रिमंडळाचा संताप
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
eknath shinde on one nation one election
CM Eknath Shinde : ‘एक देश, एक निवडणुकी’च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या निर्णयामुळे…”
aap leader Atishi
विश्लेषण: पहिल्यांदाच आमदार, पाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्रीपद; आतिशींच्या निवडीमागे ‘आप’चे कोणते समीकरण?
Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
mahayuti will contest assembly elections under the leadership of cm eknath shinde says ajit pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक; अजित पवार यांची माहिती

भाजप ओबीसी जागर यात्रेचा समारोप तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे १३ ऑक्टोंबर रोजी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यावर्षी उशिराने पेरणी झाली. पावसाचा खंड पडला त्यातच मुख्य पीक असलेल्या सोयाबीनवर पिवळा मोझ्याक पडल्याने पिके पिवळी पडली. परिणामी त्याचा परिणाम उत्पादनावर झाल्याने बळीराजा संकटात सापडला. त्यासाठी मदतीची मागणी देखील झाली.

आणखी वाचा-‘आकांक्षित’ गडचिरोलीत तब्बल ७०० पदे रिक्त; प्रशासकीय यंत्रणा ढेपाळली, सरकारचे दुर्लक्ष

आता जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन काढणी सुरू झाली आहे. मात्र असे असताना उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरादेवी येथे बोलताना म्हणाले की, पिवळा मोझ्याक मुळे झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत करण्याचा निर्णय मागील मंत्रिमंडळ बैठकीत झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. परंतु आता सर्वत्र सोयाबीन काढणी सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. शेतात पिकेच नसतील तर पंचनामे करणार कसे आणि मदत देणार कशी. असा प्रश्न शेतकरी वर्गातून होत असून उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेमुळे शेतकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

नुकसानीचा आकडा ३६ हजार हेक्टर ; पंचनामे कसे करणार ?

वाशीम जिल्ह्यात पिवळा मोझ्याक व चार्फुल रॉटमुळे ३६ हजार हेक्टर वरील सोयाबीन पिकांचे नुकसान झाले व तसा अहवाल कृषी विभागाकडून सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र पंचनामे करण्याचा आदेश उशीरा प्राप्त झाल्याने पंचनामे करण्याचा पेच निर्माण झाला आहे.