नागपूर: शहरातील विद्यमान भुयारी मार्गाचा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष उपयोग होत नसल्याचे दिसून आल्यावरही आता पुन्हा मॉरिस कॉलेज जवळ नवीन भुयारी मार्ग बांधण्याचा घाट घातला जात आहे. यासाठी ८० कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले असून महामेट्रो हे काम करणार आहे.

मॉरिस कॉलेज चौकाजवळ सकाळी आणि सायंकाळनंतर रोज प्रचंड वाहन कोंडी होते. सदर – मानकापूर भागातून येणारी व बर्डीकडे जाणारी तसेच रेल्वे स्थानक, कॉटन मार्केटकडे जाणा-या वाहनांची येथे गर्दी होते. ही कोंडी फोडण्यासाठी झिरोमाईल्स- मॉरिस कॉलेज जवळून भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता. आता त्याला मूर्त रूप येण्याची शक्यता आहे.

kolhapur Warana Dudh Sangh marathi news
वारणा दूध संघामार्फत जातीवंत म्हैस संवर्धन, विक्री केंद्राची उभारणी; ४२ हजारांचे अनुदान देणार – विनय कोरे
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Will the traffic jam on the Pune-Bengaluru Bypass break 300 Crore fund approved in principle
पुणे-बेंगळुरू बाह्यवळणावरील वाहतूक कोंडी फुटणार? तीनशे कोटींच्या निधीला तत्त्वत: मंजुरी
Contract recruitment continues through service provider company in government various departments
कंत्राटी भरतीचा पुन्हा धडाका, तीन वर्षे नियमित भरतीची शक्यता धूसर
Only 46 percent of the Kalwa Airoli Elevated Project has been completed in seven and a half years
साडेसात वर्षांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे केवळ ४६ टक्केच काम; भूसंपादन, पुनर्वसन प्रक्रियेतील संथगतीचा फटका
Kalwa-Airoli Project, Mumbai, Kalwa-Airoli,
मुंबई : साडेसात वर्षांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे केवळ ४६ टक्के काम पूर्ण
urban development department grant 55 crore fund for development works in dombivli
डोंबिवलीतील विकास कामांसाठी नगरविकास विभागाकडून ५५ कोटीचा निधी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रयत्न
Mumbai-Bengaluru journey now faster 14-lane highway to be made
मुंबई-बेंगळुरू प्रवास आता अधिक वेगवान, होणार १४ पदरी महामार्ग

हेही वाचा… रविकांत तुपकरांचा ‘स्वाभिमान’ दुखावला! शिस्तपालन समितीसमोर जाणार नाही; म्हणाले, “आता निर्णय…”

गडकरींनी केंद्रीय रस्ते विकास निधीतून या कामासाठी ८० कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. त्यांनी हा निधी महामेट्रोकडे वळता केला आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या मनीषनगर, आनंद टॉकीज, कॉटन मार्केटमध्ये महामेट्रोनेच बांधलेले भुयारी मार्ग वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष उपयोगी ठरले नाही. त्यामुळे हा नवा भुयारी मार्ग कितपत उपयोगी ठरेल याबाबत साशंकता आहे.