नागपूर : दिल्लीत नवीन सरकार सत्तारुढ होण्याबाबत हालचाली सुरू झालेल्या असताना गुरुवारी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून नागपुरात दाखल झाले व त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी सुमारे दीड तास चर्चा केली. त्यानंतर फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले. फडणवीस यांनी अलीकडेच ‘मला सरकारमधून मोकळे करा’ अशी विनंती भाजपश्रेष्ठींकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते.

सध्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता विकास वर्ग सुरू आहेत. त्यानिमित्त देशभरातील संघाचे पदाधिकारी येथे आले आहेत. देवेंद्र फडणवीस गुरुवारी दुपारी नागपुरात आले. धरमपेठ येथील निवासस्थानी गेले. तेथे काही वेळातच संघाचे तीन राष्ट्रीय पातळीवरचे संघाचे पदाधिकारी आले. त्यांनी जवळपास दीड तास फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले.

devendra fadnavis interview in loksatta Varshvedh event
महाराष्ट्रात युतीचे राजकारण आणखी काही काळ चालेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
Rohit Pawar On Delhi Election Result
Rohit Pawar : “…तर भाजपाच्या २० जागाही आल्या नसत्या”, रोहित पवारांची दिल्लीच्या निकालावर सूचक प्रतिक्रिया
Kerala Politics
Kerala Politics : आगामी विधानसभेनंतर केरळच्या मुख्यमंत्री पदावर आययूएमएल दावा करणार? मित्रपक्ष काँग्रेसला दिला इशारा
Vacant posts of police officers in the maharashtra state
राज्यात पोलीस अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त; कायदा व सुव्यवस्था धोक्यात : तपासावरही परिणाम
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

हेही वाचा – नागपूर लोकसभा निवडणूकीत बसपच्या मतांमध्ये घट, सलग चौथ्या निवडणूकीत…

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्लीला पोहोचले. मात्र फडणवीस निकालानंतर दोन दिवसांनी नागपुरात आले आणि ते चार तास थांबून दिल्लीला रवाना झाले. ते संघाचा संदेश घेऊन दिल्लीला गेले अशी चर्चा आहे. मात्र याबाबत भाजप व संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आम्हाला याबाबत काही माहिती नसल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात मिळालेले अपयश बघता फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी आपल्यावर घेऊन त्यांनी मला सरकारमधून मोकळे करा अशी विनंती पक्षातील वरिष्ठाकडे केल्यानंतर फडणवीस यांच्या समर्थकामध्ये अस्वस्था निर्माण झाली. त्यानंतर लगेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित मुंबईला बैठक घेऊन फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा कुठलाही निर्णय घेऊ नये अशी विनंती केली. फडणवीस यांच्या निर्णयाचे पडसाद त्यांच्या समर्थकामध्ये आणि संघ स्वयंसेवकामध्ये उमटले आणि अनेकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – मोसमी पावसाचे आगमन, की नुसतीच घाई..!

फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्यासंदर्भात असा कुठलाही निर्णय घेऊ नये अशी विनंती केली. शाखांमध्ये संघ स्वयंसेवकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली असून फडणवीस यांनी असा कुठलाही निर्णय घेताना संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी अशी सूचना काहींनी केली. मात्र फडणवीस गुरुवारी नागपुरात आल्यानंतर संघाचे पदाधिकारी त्यांना भेटायला आले आणि त्यांच्यासोबत दीड तास चर्चा केली. गेल्या काही वर्षात संघाचे पदाधिकारी कुठल्याच भाजप नेत्यांना भेटायला येत नाही तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपचे भेटायला जातात मात्र फडणवीस यांची संघ पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटीची आज नागपूरसह राज्यात चांगलीच चर्चा होती. दरम्यान दिल्लीला जाण्यापूर्वी फडणवीस यांनी स्थानिक आमदार आणि काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना सूचना करुन लवकरच नागपुरात विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले.

Story img Loader