२०१९ साली विधानसभेत आणि प्रचारावेळी देवेंद्र फडणवीसांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. त्यावरून देवेंद्र फडणवीसांवर टीकाही झाली होती. पण, २०१९ साली महाविकास आघाडीचं सरकार आल्याने देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न धुळीस मिळालं होतं. मात्र, गतवर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस पुन्हा आले ते उपमुख्यमंत्री म्हणून… अशातच आता ‘पुन्हा येईन’च्या नाऱ्यावरून फडणवीसांनी टोलेबाजी केली आहे.

“‘मी पुन्हा येईन’ कविता म्हटल्यावर वाटलं नव्हतं, इतकी अडचण होईल”, अशी मिश्कील टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Pm Narendra Modi Speech in Rajayasabha
Pm Narendra Modi : “काँग्रेससाठी गाणं न म्हटल्याने किशोर कुमार यांना आकाशवाणीचे दरवाजे बंद” झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी देखील विधानसभेत ‘मी पुन्हा येईन’ ही कविता केली होती. तेव्हा वाटलं नव्हतं, इतकी अडचण होईल. लोकांनी कविता डोक्यावर घेतली होती. आठ दिवसांत दहा भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकार आलं नाही. कवितेमुळे राज्य सरकार गेलं, असं सांगितलं गेलं.”

“शेवटी मला हे सांगावं लागलं की, मी जे ‘पुन्हा येईन’ म्हणाला होतो. ते मी पन आलो आणि इतरांनाही बरोबर घेऊन आलो. परवा अजून एकाला बरोबर घेतलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीत कविता प्रत्यय देत असते,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Story img Loader