नागपूर : महाविकास आघाडीमध्ये सगळे इंजिन एका रांगेत उभे आहेत. सर्व हात वर करून आम्ही एकत्र आहोत असे सांगायचे आणि पुन्हा आपापले इंजिन घेऊन वेगळ्या दिशेने निघून जायचे. असे इंजिन काय कामाचे आहे? आता या तुटलेल्या इंजिनवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांशी बोलत होते.

कोणीतरी महाविकास आघाडीचे वर्णन अतिशय चांगले केले. महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल, ही आघाडी केवळ इंजिन आहे. यांना एकही डबा नाही. त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची ही जागा नाही. प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेने चालले आहे त्यामुळे हे जनतेच्या कामाचे नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
UCC in Gujarat : कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण
Congress to help Aam Aadmi Party against BJP in final phase
अखेरच्या टप्प्यात ‘आप’च्या मदतीला काँग्रेस?
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवरच बलात्काराचा गुन्हा, पक्षासमोरील अडचणी वाढल्या; हरियाणात राजकीय घडामोडींना वेग (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवरच बलात्काराचा गुन्हा, पक्षासमोरील अडचणी वाढल्या; हरियाणात राजकीय घडामोडींना वेग
supriya sule latest news
“असंविधानिक पदनिर्मितीत महाराष्ट्र सर्वांत पुढे”, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

हेही वाचा…दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजपा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी आमची युती श्रीकांत शिंदे यांना निवडून आणेल, असेही फडणवीस म्हणाले.

बूथ चलो अभियान हे वारंवार आम्ही राबवत असतो. स्थापना दिवसाचे औचित्य साधून आम्ही पुन्हा एकदा बूथवर चाललो आहोत.भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे जो ‘बूथ’ ला प्रमुख धरून काम करत असतो.त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे सोपे होते.

हेही वाचा…विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?

महायुतीत तीन पक्ष सोबत आहे त्यामुळे मित्र पक्षांचा सन्मान राखणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे लोकसभेच्या ३३ जागा आम्ही लढणार असा आम्ही कधीही दावा केला नव्हता. आमचा प्रयत्न होता की तिघांचाही सन्मान राखून ज्या जागा मिळतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे आणि तशा जागा आम्हाला मिळाल्या आहेत जयंत पाटील हे पक्षातील नेतृत्वावर नाराज आहेत .त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे असेही फडणवीस म्हणाले.

Story img Loader