वर्धा : राजकारणात धुरळा उडवून देण्याचे काम एक फंडाच समजल्या जातो. त्यामुळे कोण कुणाची कशी फसगत करेल, हे सांगता येत नाही. समाज माध्यमातून मेट हिरजी येथील सरपंच पुष्पाताई चारोडे व सुसुंद येथील सरपंच अंकुश ठाकरे यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. हे दोन्ही सरपंच खरे तर काँग्रसचे. मग भगवा व कमळ दुपट्टा घालून यांनी भाजपा प्रवेश कसा केला, असा प्रश्न काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना पडला.

हेही वाचा – वनसंपदेवर ‘आपदा’! मुंबई, कोलकाताच्या क्षेत्रफळापेक्षाही अधिक वनजमिनींचा विकास प्रकल्पांसाठी वापर; वाचा, काय आहे प्रकरण?

हेही वाचा – अकोला : याला म्हणतात शिस्त! हनुमान जयंतीनिमित्त माकडांसाठी महापंगत; वानरसेनेचा रांगेत बसून प्रसादावर यथेच्छ ताव..

काळे यांनी या दोघांना विचारले तेव्हा आज बनवाबनवी उघड झाली. काळे यांच्या निवासस्थानी त्यांनी सांगितले की, आमच्या गळ्यात भाजपा आमदार ( दादाराव केचे ) यांनी जबरदस्तीने त्यांच्या पक्षाचा दुपट्टा टाकला. आम्ही तर काँग्रेसचेच एकनिष्ठ आहोत व राहणार. हा खुलासा आज जाहीर झाल्याने कारंजा तालुक्यात बनवाबनवीपासून सतर्क राहण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Story img Loader