दिशा सालियान प्रकरणावरून पुन्हा एका एकदा राजकारण तापलं आहे. बुधवारी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी अभिनेता सुशांतसिह राजपूत प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन करण्यात आला, असा शेवाळेंनी लोकसभेत म्हटलं. यानंतर या वादात भाजपा आमदार नितेश राणेंनी उडी घेतली होती.

गुरुवारी नितेश राणेंनी दिशा सालियान प्रकरण विधानसभेत मांडलं होतं. “कोणाच्या राजकीय राजकीय दबावामुळे दिशा सालियन प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला. तिच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं. ८ जूनच्या पार्टीत कोण कोण होतं, याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी नितेश राणेंनी केली होती.

Gang rape of a minor girl vasai crime news
वसई: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
TRAGIC! Hyderabad Youth Falls Off 3rd Floor Of Hotel Building While Trying To Shoo Away Dog
मृत्यू आपल्याला कसा जाळ्यात ओढतो पाहा; तरुणाच्या मृत्यूचा थरारक VIDEO बघून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
mother expressed grief, child orphanage,
आई म्हणून मीच एकटी दोषी का रे!
bahraich violence
बहराइच हिंसाचार प्रकरण : गोपाल मिश्राच्या मृत्यूपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पोलीस म्हणाले…
vinod kumar accuses on prakash raj of 1 crore loss
प्रकाश राज यांच्यामुळे झालं एक कोटींचं नुकसान, दाक्षिणात्य सिनेमाच्या निर्मात्याचे आरोप; म्हणाले, “तुम्ही कोणालाही न सांगता…”
kedar Dighe on Anand Dighe
Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंचा घात झालाय”, शिरसाटांच्या विधानावर केदार दिघेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी तयारी आहे की…”
Manoj Bajpayee on being stereotyped as middle class No director could think of me as a rich guy experts share ways to deal with rejection
“कोणताही दिग्दर्शक माझा श्रीमंत व्यक्ती म्हणून भूमिकेसाठी विचार करत नाही..”; मनोज बाजपेयींना असे का वाटते? तज्ज्ञांनी केला खुलासा

हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ फोन कॉलची चौकशी होणार? शंभूराज देसाई म्हणाले “गुप्तचर विभागाकडून…”

नितेश राणेंच्या आरोपांना आता आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “दिशा सालियनचा मृत्यू झाला, त्यादिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं होतं. त्यामुळे मी रुग्णालयात होतो. त्यांना काढायचं ते काढून द्या. पण, सत्य आहे ३२ वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरलं आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घोटाळा काढून हादरवून ठेवलं आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

हेही वाचा : जयंत पाटलांच्या निलंबनानंतर विरोधकांचा मोठा निर्णय, कामकाजावर बहिष्कार, आदित्य म्हणाले “सत्तामेव जयतेच्या….”

शिंदे गटावरही आदित्य ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. “यांचा मुखवटा फाडून खरा चेहरा दिसत आहे. लाज वाटते आणि किळस येतो, कधीकाळी ते आमच्याबरोबर होतो. बरं झाले तिकडे गेले आणि खरा चेहरा दाखवत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना गुंतवणूक, रोजगारासाठी काम करत होतो. कर्नाटकच्या विरोधात आम्ही बोलत होतो. महाराष्ट्राची ताकद आणि हिंमत दिसत होती. पण, आता कर्नाटक आणि शेतकऱ्यांवर बोलायला तयार नाही,” असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर केला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.