लोकसत्ता टीम

गडचिरोली: शेकडो वर्षांपासून आदिवासींनी संरक्षित केलेले जंगल खाणींमुळे धोक्यात आले आहे. यामुळे येथील रहिवाशांवर विस्थापनाची वेळ येत आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या सूरजागडसह इतर प्रस्तावित सहा खाणी रद्द करण्यात याव्या, अशी मागणी ४० ग्रामसभांनी केली आहे.

The administration is aware of the agitation of the tribals regarding the forest rights claim
शहरबात: आदिवासींच्या ‘सत्याग्रह’ने प्रशासन जागरूक
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
A march to the collector office for various demands of tribals nashik
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Shiv Sena Dipesh Mhatre billboards banned in Thakurli Cholegaon dombivli
ठाकुर्ली, चोळेगाव हद्दीत शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांचे जाहिरात फलक लावण्यास बंदी; चोळेगाव ग्रामस्थांचा निर्णय
Bhoomipujan municipal development works Mumbai,
मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका
Mumbai Municipal Corporation will conduct a survey of sanitation workers Mumbai
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे महापालिका सर्वेक्षण करणार; विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन
Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता
A garba event in Indore has been cancelled in Indore
Garba Cancelled : “हिंदू महिला आणि मुस्लिम पुरुषांमधील संबंध वाढवण्यासाठी गरब्याचं आयोजन”, बजरंग दलाचा आरोप; ३५ वर्षांची परंपरा खंडित!

एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ५० किमी अंतरावरील व छत्तीसगड सीमेलगत असलेल्या तोडगट्टा गावात ९ मार्चपासून ग्रामसभेमार्फत आंदोलन सुरू आहे. यामध्ये तालुक्यातील प्रस्तावित पुस्के, नागलमेठा, मोहद्दी गुंडजुर, वाळवी वनकुप या प्रस्तावित सहा लोहखाणींसह बेसेवाडा, दमकोंडावाही आदी लोहखाणीला ग्रामसभेचा विरोध आहे. या खाणींसाठी संरक्षित क्षेत्रात नवीन रस्ते, पूल, पोलीस ठाणे, मोबाईल टॉवर उभारले जात आहे, याला देखील ग्रामसभांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

प्रशासनाची दडपशाही चुकीची

शासनाला या भागाचा विकास करायचा असेल तर त्याला ग्रामसभांचा विरोध नाही. परंतु, खाणीला विरोध आहे. रस्त्यासह मूलभूत सोयीसुविधा सर्वांनाच हव्या आहेत. हेडरी गट्टा या मुख्य मार्गाची अत्यंत दुरवस्था आहे, असे असतानाही याकडे दुर्लक्ष करून केवळ खाणीच्या सोयीसाठी नवीन मार्ग बनवणे हे चुकीचे आहे. शासनाने ग्रामसभेचे म्हणणे ऐकून मार्गदर्शन करावे. प्रशासकीय दडपशाही करू नये. ग्रामसभेच्या मागणीची दखल घेईपर्यंत साखळी आंदोलन सुरू राहील, असा इशारा सूरजागड इलाखा प्रमुख सैनू गोटा यांनी दिला आहे.