नागपूर : “राजकीय क्षेत्रात काम करताना ८० टक्के समाजकारण केले तर नेत्यांना राजकारण करण्याची कधीही गरज पडणार नाही”, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतंर्गत उत्तर-पूर्व नागपूर आणि नागपूर ग्रामीण क्षेत्रातील अपंगांना गडकरी यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कामठी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे , आमदार टेकचंद सावरकर, आशीष जैयस्वाल उपस्थित होते.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
intra party discord seen during protest against ec organized by pune congress
काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते वेठीला? शहरातील पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार

हेही वाचा – गोंदिया : ना, ना करत पटोलेंनीही धरला ठेका; भीम ज्योती रॅलीत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर केला डान्स, एकदा पहाच..

केंद्र सरकारच्या योजनेतंर्गत केवळ नागपूर शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अपंगाना नि:शुल्क साहित्य उपलब्ध करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आतापर्यंत ५० हजारपेक्षा अधिक साहित्य वाटप करण्यात आले आहे. राजकीय क्षेत्रात काम करताना ८० टक्के समाजकारण केले तर राजकारण करण्याची गरज पडणार नाही. समाजातील गोरगरीब, अन्यायग्रस्त आणि अपंगांसाठी काम केले तर आपल्याला आनंद मिळत असतो. ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्याचे आशीर्वाद मिळाले तर आपले जीवन सुखकर होत असते, असेही गडकरी म्हणाले.

Story img Loader