नागपूर : पाच वर्षे जुन्या तक्रारींमध्ये सतत ‘समन्स’ पाठवित राहणे, त्या तक्रारींवर कोणताही निर्णय न घेणे, अशा चुका करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करा, अशी मागणी करणारी याचिका निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सचिव प्रमोद मानमोडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावली आहे.

पोलिसांत तक्रार दाखल झाल्यास पुढील सात दिवसांत त्याचा सोक्षमोक्ष लावावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेत. मात्र, मानमोडे यांच्याविरुद्ध पोलीस सातत्याने जुन्या तक्रारींमध्ये ‘समन्स’ काढत राहतात. हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. त्यामुळे यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे मानमोडेंनी केली आहे.

12 lakh fraud by cyber thieves Pune news
मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंटची बतावणी; सायबर चोरट्यांकडून एकाची १२ लाखांची फसवणूक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Badlapur Harassment case Suspension of Thane Education Officers for evading case responsibility Mumbai news
बदलापूर अत्याचार प्रकरण: जबाबदारी झटकल्याने ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा
high court
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, न्यायिक अधिकाऱ्यांच्या नावेही पैशांची मागणी; उच्च न्यायालय प्रशासनाकडून प्रकाराची गंभीर दखल
Panvel, administrative building Panvel,
पनवेल : प्रशासकीय भवनाच्या विकासाचा मार्ग मोकळा, ‘त्या’ तीन गाळे मालकांचा दावा दिवाणी न्यायालयाने फेटाळला
Crime against office bearers of society in Aundh for excommunicating a computer engineer
संगणक अभियंत्याला बहिष्कृत केल्याप्रकरणी औंधमधील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
deepak kesarkar
भूमिगत बाजारपेठेबाबत अधिकाऱ्यांची चालढकल

हेही वाचा – अकोला : ‘भेटी लागी जीवा’तून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे विलोभनीय दर्शन

ॲड. रजनीश व्यास यांनी मानमोडेंची बाजू मांडली. या व्यतिरिक्त मानमोडेंविरुद्ध नंदनवन पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशीही मागणी करणारी एक स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली आहे. करारातील अटीचे उल्लंघन करून पावणेसहा कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कराराच्या अटींचे उल्लंघन झाल्यास ते दिवाणी प्रकरण असून त्यात गुन्हा दाखल करता येणार नाही, असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणीसुद्धा पोलिसांना नोटीस बजावली आहे.