नागपूर : घरात अठराविश्वे दारिद्र्य… घरातील पुरुषांना व्यसन… परिस्थितीशी संघर्ष करत आणि आयुष्यभर काबाडकष्ट करून जीवनात समाधान शोधणाऱ्या घरगुती महिला कामगार आयुष्यात पहिल्यांदा विमानाच्या पायऱ्या चढणार आहेत. आयुष्यात कधी त्यांनी रेल्वेने देखील प्रवास केला नाही, पण ‘जिवाची मुंबई- श्रमाची आनंदवारी’ करण्यासाठी त्या विमानाने रवाना झाल्या आहेत.रसिकाश्रय ही यवतमाळ येथील सामाजिक कार्यात अग्रेसर संस्थेकडून हा उपक्रम राबवला जात आहे. मागील वर्षी सुमारे २५ जणांना ‘जिवाची मुंबई’ घडवून आणली. आता यवतमाळ जिल्ह्यातील २० महिला कामगारांना ‘श्रमाची आनंदवारी’ घडवून आणत आहेत.

दररोज सकाळी उठून घरोघरी धुणीभांडी करतात. ज्या घरी काम करतात त्या घरचे शिळे अन्न विनातक्रार ग्रहण करतात. शिवाय घरात अठराविश्व दारिद्र्य आणि घरातील पुरुषांचे व्यसन या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना आनंद देण्यासाठी ‘जीवाची मुंबई-श्रमाची आनंदवारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Sanjay raut on all part mps meeting
Maharashtra Breaking News LIVE Updates : “श्रीमंतांची मुलं चार्टर प्लेननं बँकॉकला…”, तानाजी सावंत यांच्या मुलासंदर्भात संजय राऊतांची खोचक टिप्पणी!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
honour killing interfaith marriages
आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांसाठी ‘सेफ हाऊस’, ‘ऑनर किलिंग’ थांबवण्याकरिता राज्य सरकारचा पुढाकार
next cm in delhi wont stay in sheeshmahal
Delhi CM: दिल्लीतला ‘शीशमहल’ ओस पडणार? भाजपाचे मुख्यमंत्री निवासस्थान बदलणार!
amitabh bachchan company godha announced ipca will begin trial production in Hingani investing 250 crore rupees
अमिताभ बच्चनची कंपनी वर्ध्यात उद्योग सुरू करणार ? अशा घडल्या घडामोडी…
Tanaji Sawant Son Missing
Tanaji Sawant Son Missing : तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंत सुखरुप परतला; नेमकं काय झालं होतं? पुणे पोलिसांनी दिली मोठी माहिती
shopping gets shapped by emi and budget 2025 announcments
Indian Market Analysis: साबण झाले छोटे, टीव्ही झाले मोठे; भारतीय बाजारात ग्राहकांची खरेदीची पद्धत बदलू लागलीये!
Viral Video Surat
VIDEO : बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारख्या ३० अलिशान गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या अन्…; शाळकरी मुलांंच्या ‘त्या’ कृत्याने सर्वच हैराण!

२० निवडक महिलांना नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास करायला निघाल्या आहेत. या महिलांना मुंबईची चौपाटी, समुद्रकिनारे, मराठी अभिनेत्यांची, मुख्यमंत्र्यांशी भेट घडवली जाणार आहे. यावेळी या महिलांमध्ये एकीकडे मुंबईला विमानाने जाण्याचा आनंद तर दुसरीकडे डोळयात आनंदाश्रू होते.रसिकाश्रय ही यवतमाळ येथील सामाजिक संस्था आहे. संस्थेकडून यवतमाळ जिल्ह्यातील २० महिला कामगारांना ‘श्रमाची आनंदवारी’ घडवून आणली जात आहे.

पहिल्यांदा स्वत:साठी आनंद शोध

दारूड्या पतीला कंटाळून गेल्या १८ वर्षांपासून आईकडे मुलाला घेऊन राहते. धुणीभांडी करून महिन्याला नऊ हजार रुपये कमावते. महागाईत घर चालवणे खूप कठीण आहे. पहिल्यांदा कुठेतरी स्वत:साठी आनंद शोधणार आहे. रजनी एडेंटीवार, (३५ वर्षे, घाटंजी )

https://twitter.com/LoksattaLive/status/1889200731691049298

मुंबईला जाण्याचा आनंद

घरात एक मुलगा, सून, एक नात आणि नातू आहे. वयाच्या पंचाहत्तरीत पोहोचली आहे. नीट सरळ चालता देखील येत नाही. तरीही धुणीभांडी करते. महिन्याला २५०० रुपये कमवून कुटुंबाला हातभार लावते. आयुष्यात कधी रेल्वेची पायरी त्या चढली नाही. मात्र, मुंबईला जाण्याचा आनंद आहे. इंदूबाई बावणे, (७५ वर्षे, घाटंजी )

Story img Loader