चंद्रपूर : सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून आजही कृषी क्षेत्राचा नावलौकिक आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढले असले तरी कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही. खरीप हंगामाला आता सुरुवात होत आहे. अतिशय महत्त्वाचे असलेल्या या हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंत्रणेला दिले.

नियोजन सभागृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, देवराव भोंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाच्या (आत्मा) प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके यांच्यासह तालुका कृषी अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

centre likely to approve gst exemption on senior citizen health insurance premiums
आरोग्यविम्यावरील जीएसटीत सवलत; मंत्रिगटाचा प्रस्ताव; अंतिम निर्णय परिषद घेणार
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Loksatta anvyarth N Chandrababu Naidu ED Skill development scam
अन्वयार्थ: तेव्हा भ्रष्ट, आता स्वच्छ…
slum Dharavi, House slum dwellers Dharavi,
धारावीतील सर्व अपात्र झोपडीवासीयांना घरे! शासनाकडून धोरण जाहीर
Diwali bonus for permanent employees but not for contract employees
कायमस्वरूपींना बोनस पण कंत्राटी मात्र वाऱ्यावर!
Narendra Modi on jammu kashmir election
दिवाळीपूर्वी मोदी सरकारची सर्वसामान्यांना मोठी भेट; मोफत धान्य वितरणाला २०२८ पर्यंत दिली मुदतवाढ!
Nitin Gadkari has given warning that he will suspend officials found guilty and blacklist the contractors
नितीन गडकरी म्हणाले “मी कमिशन घेत नाही, कामात कसूर केल्यास…”
Benefits of PPF Investment in 2024
‘पीपीएफ’ गुंतवणूकदारांना मिळणार ७.१ टक्क्यांचा लाभ; पोस्टाच्या योजनांवरील व्याजदर सलग तिसऱ्या तिमाहीत जैसे थे!

हेही वाचा – वर्धा : वादग्रस्त उपविभागीय अधिकाऱ्याची अखेर बदली

खरीप हंगामाला आता काही दिवसांतच सुरवात होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बियाणांची टंचाई होऊ देऊ नका, असे सांगून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, नकली बियाणे लावले तर शेतकऱ्याचे संपूर्ण वर्ष वाया जाते. जिल्ह्यात नकली बियाणांची आवक, वाहतूक व विक्री होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणेने सजग राहावे. केवळ एक खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली म्हणजे प्रश्न सुटतात, असे समजू नका. तर वारंवार निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागाने समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कृषी क्षेत्रात जास्त काम करण्याची क्षमता ठेवून जिल्ह्याचा लक्षांक वाढवून घ्यावा. तसा प्रस्ताव राज्यस्तरावर सादर करावा. आपल्या विभागाप्रती शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होणार नाही, याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. तसेच मिशन जय किसानअंतर्गत आपला जिल्हा राज्यात पायोनियर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

पुढे ते म्हणाले, सन २०२२-२३ मध्ये खाजगी बँकेने अतिशय कमी पीक कर्ज वाटप केले आहे. त्यांच्या बँकेत असलेले शासकीय खाते तात्काळ काढून राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग करा. पीक कर्जवाटपबाबत शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये. चंद्रपूर जिल्ह्यात उत्तम प्रतिचे धान उत्पादन होते. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत बोनस देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी जास्तीत जास्त धान उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करा. बोनससाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांना सरकारच्या वतीने अनुदान दिले जाते त्यांना प्राधान्याने वीज कनेक्शन देण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, जुलैमध्ये अल-नीनोची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसावर होईल. कमी पाऊस झाला तर कसे नियोजन करायचे, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याचा सिंचन आणि कृषी विभागाने अभ्यास करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उकिरडा मुक्त गाव –  खतयुक्त शिवार अभियानच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

हेही वाचा – अकोला : कथेतील भाविकांच्या सोनसाखळीवर त्यांचा डोळा; आंतरराज्य टोळीला पोलिसांनी असे केले जेरबंद

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनी सादरीकरणात सांगितले की, जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ११ लक्ष ४४ हजार ३०० हेक्टर आहे. यापैकी लागवडीखाली क्षेत्र ५ लक्ष ५२ हजार ७२९ हेक्टर आहे. जिल्ह्यात ४ लक्ष ७० हजार हेक्टरवर खरीपची लागवड होत असून १ लक्ष २७ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात येते. जिल्ह्यात धानाची लागवड १ लक्ष ८५ हजार ५१६ हेक्टरवर (३९.४० टक्के),  कापूस १ लक्ष ७४ हजार ९६१ हेक्टरवर (३७.१६3 टक्के), सोयाबीन ७० हजार ५८० हेक्टरवर (१५ टक्के), तूर ३४ हजार ३११ हेक्टरवर (७.२९ टक्के), ज्वारी २१९३ हेक्टरवर (०.४७ टक्के) तर इतर पिके ३२६४ हेक्टरवर (०.६९ टक्के) लागवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये पीक कर्ज वाटपाच्या १२९१ कोटी उद्दिष्टापैकी ८७८ कोटी ३३ लक्ष रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यात राष्ट्रीयकृत बँक १८४.७८ कोटी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ५७६.१६ कोटी, ग्रामीण बँक ८८.६३ कोटी तर खाजगी बँकांकडून २८.७६ कोटी रुपये कर्ज स्वरुपात वाटण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.