नागपूर: राज्यघटना लिहिली जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भारताला हिंदू राष्ट्र करण्याबाबत दबाव टाकला जात होता. परंतु, त्यांनी या दबावाला भीक घातली नाही, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (सीपीआय) सरचिटणीस व माजी खासदार डी. राजा यांनी केले.

कॉम्रेड एच.एल. परवाना मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने ‘परवाना ओरेशन-२०२३’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सी.एच. वेंकटचेलम, रामकुमार गुप्ता, सुरेश बोभाटे, डी.एस. बुचे, जे.एस. गुरव, राम नेरकर, बी.एन.जे. शर्मा उपस्थित होते.

Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
minister uday samant on Marathi language,
मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढू; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील

डी. राजा म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून संबोधण्याची मागणी अमान्य केली होती. तसेच त्यांनी अध्यक्षीय लोकशाही देखील नाकारली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशाप्रकारची लोकशाही म्हणजे हुकूमशाहीला चालना होती. आंबेडकरांमुळेच आज आपल्या देशात बहुपक्षीय लोकशाही, संसदीय लोकशाही आहे.

हेही वाचा… नागपूर विद्यापीठाला शंभर वर्षांचा इतिहास, १९५० ला आले होते पहिले राष्ट्रपती

उद्योगपती गौतम अदानी आणि देशातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाचे एकच मूल्य आहे. पण, येथील नागरिक आणि गौतम अदानी समान आहोत, असे मात्र आपण म्हणू शकत नाही. एवढी आर्थिक, सामाजिक दरी या देशात निर्माण झाली आहे. या विषमतेला खतपाणी घालण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. करीत राज्यघटना, लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला आगामी निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन डी. राजा यांनी केले.

Story img Loader