लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी वगळता पावसाने जवळजवळ राज्यातून काढता पाय घेतला आहे.

एकीकडे देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पाऊस धो धो कोसळत असताना महाराष्ट्रावर त्याची वक्रदृष्टी कायम आहे. जून आणि जुलैचा पहिला आठवडा वगळला, तर त्याच महिन्याच्या अखेरपासून मात्र पावसाने मारलेली दडी ऑगस्ट अखेरपर्यंत कायम आहे.

आणखी वाचा-समृद्धीवर प्राण्यांमुळे ८३ अपघात, आणखी कोणत्या कारणाने किती अपघात…

पावसाने राज्यातून काढता पाय घेतल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. एकिकडे शेतीचे नुकसान आणि दुसरीकडे कर्जाची टांगती तलवार अशाच परिस्थितीमध्ये हा शेतकरी अडकला आहे.

काही दिवसांपूर्वीच हवामान विभागानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतरच पावसासाठी पूरक वातावरण निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता सात सप्टेंबरमध्ये पाऊस परतणार असे सांगितले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to stop the rain the farmers face a big crisis rgc 76 mrj
Show comments