गडचिरोली: मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच ठिकाणी पावसाचे प्रमाण कामी आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा तीच परिस्थिती असताना धरणाचे पाणी सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पाल नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गडचिरोली – नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. तर अनेक मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक पाणी जमा झाल्यास जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. मागील वर्षी तर परिस्थिती अतिशय बिकट होती. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने प्रभावित क्षेत्रातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु मध्यप्रदेशातील संजय सरोवर, महाराष्ट्रातील गोसेखुर्द, तोतलाडोह आणि धापेवाडा या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने गडचिरोलीतील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

road accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ठाणे, भिवंडी कोंडले
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hinjewadi it park traffic jam news
पिंपरी : शहरातील एनएच-४८ महामार्ग सेवा रस्त्यांचा होणार विस्तार, आयटी पार्क हिंजवडीतील कोंडी सुटणार…
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
daily passengers traffic jam Shilphata route five day road work
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
Pune Traffic Congestion, Amitesh Kumar,
पुणे : कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?

हेही वाचा… संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, चित्रा वाघ यांची टीका

या धरणांमधून ६.५० लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी थेट वैनगंगेला येत असल्याने गडचिरोलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आरमोरी मार्गावरील पाल नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गडचिरोली-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. धरणातून असाच विसर्ग सुरू राहिल्यास जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन यावर लक्ष ठेऊन आहेत. गरज पडल्यास आपत्ती व्यवस्थापन चमू देखील तयार ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

Story img Loader