लोकसत्ता टीम

गोंदिया : राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांना विमान घोटाळा प्रकरणी सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना दिलासा मिळाला आहे. सीबीआयने दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात या याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सन २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलं आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल पटेल यांना टोला लावला असून ते वाशिंग मशीन मध्ये गेले आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे जे व्हायचं ते होणारच होतं असं म्हटलं आहे.

Ajit Pawar On Raigad DPDC Meeting
Ajit Pawar : महायुतीत धुसफूस? ‘डीपीडीसी’च्या बैठकीला शिंदेंचे आमदार गैरहजर; अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “कोणत्याही आमदारांना…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
Kaustubh divegaonkar
आपल्या मुलांच्या मराठीचे काय? असे का म्हणाले सनदी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर?
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
Eknath Shindes statement said beloved brother is bigger than post of Chief Minister or Deputy Chief Minister
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापेक्षा लाडका भाऊ मोठा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान
Image Of Devendra Fadnavis And Eknath Shinde
Devendra Fadnavis : “आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत”, ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावे
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण

देशात गेल्या १० वर्षापासून ईडी आणि सीबीआय हे नरेंद्र मोदी यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जे तिकडे गेले त्यांना माफी मिळणारच आहे. असे नाना पटोले म्हणाले… तिरोडा येथील जुनी नगर परिषद ग्राउंड वर गुरूवारी प्रचार सभा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत ते बोलत होते. पटोले म्हणाले की पुढील काही दिवसात त्यांना इकबाल मिरची प्रकरणातून पण क्लिनचिट मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हे समजण्यास पण आता हरकत नाही.

आणखी वाचा-शिवजयंतीला गालबोट, मिरवणुकीवर दगडफेक; नांदुऱ्यात अटकसत्र सुरू

रामटेक मतदारसंघा बद्दल बोलताना पटोले म्हणाले तिथं दुसरा फार्म आम्ही भरला होता. त्यामुळे तिथं आमचा उमेदवार आणि पंजा दोन्ही राहणार आहे. हे सगळी राजकीय द्वेषपोटी भाजपनी केलेली खेळी आहे. पण ते इतक्या खालच्या पातळीपर्यंत प्रयत्न करणार ही अपेक्षा नव्हती. अमरावती नवनीत राणा भाजपची उमेदवार यावर बोलताना पटोले म्हणाले की भाजपची केंद्र सरकार घाबरल्यामुळे लहान सहान पक्षांनाही जवळ करत आहे. चारशे चे लक्ष ठेवता आणि तुम्हाला अश्या प्रकारे उमेदवार आयात करावे लागत आहे. एकंदरीत भाजपला समोर पराभव दिसू लागला आहे . त्यामुळे दुसऱ्यांचे नेते पळविणाऱ्या हा पक्ष आहे अशी टीका ही पटोले यांनी केली.

ज्याप्रमाणे दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सारख्या लोकांना ई डी मध्ये अडकविले जात आहे. शिवसेना उबाठा चे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ई डी ची नोटीस घाबरविण्याकरिता दिलेली आहे. खरं तर आता ई डी भाजप नेत्यांना लागायला पाहिजे. ७० हजार कोटीचा घोटाळा पंतप्रधान जाहीर करतात आणि दोन दिवसांनी त्यांच्याच मांडीला मांडी बसता,त्यांना मंत्रिमंडळात घेतले जाते. अश्या भ्रष्टाचारी लोकांवर ई डी लावायला पाहिजे.पण ते नाही करणार.. विरोधकांची अश्या प्रकारे मुस्कटदाबी आता सहन केली जाणार नाही,निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. जनता जनार्धन हे सर्व बघत आहे.

आणखी वाचा-ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…

लोकांमध्ये मोदी सरकार विरोधात प्रचंड राग आहे. शेतकरी, तरुण, छोटा व्यापारी ,सर्व सामान्य जण यांच्या मनात राग आहे.त्यामुळे पुढील निवडणुकीत हे १५० पार जाणार नाहीत. यांना सत्तेतून जनताच बाहेरचा मार्ग दाखविणारा अशी टीका काँग्रेस पक्षातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या प्रसंगी गोंदिया भंडारा लोकसभा काँग्रेस उमेदवार डा. प्रशांत पडोळे , नीलम हलमारे,अमर वराडे आदि उपस्थित होते.

Story img Loader