अहंकार हा समाजाच्या प्रगतीत खोडा निर्माण करतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. माधव नेत्रालयाच्या प्रिमियम सेंटरचे वास्तू पूजन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वामी सवितानंद महाराज, सोलार इन्डस्ट्रीज लि.चे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, डॉ. निखिल मुंडले, डॉ. हर्षवर्धन मार्डीकर, मेजर जनरल (सेवानिवृत्त) अनिल बाम उपस्थित होते.

हेही वाचा >>> ऐकावं ते नवलंच! राष्ट्रीय महामार्ग बांधकामासाठी वापरणार राख

Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
painting show woman in the Byzantine period
दर्शिका: बाईच्या जातीनं कसं दिसायला हवं…?
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
शिवसेना शिंदे गटात मोठी फूट पडणार? उदय सामंत यांच्या नावाची का होत आहे चर्चा? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उदय सामंत हे एकनाथ शिंदेंना पर्याय ठरू शकतात का?

यावेळी भागवत पुढे म्हणाले, कोणतेही अस्तित्व हे एकाचे नसते. व्यक्ती आणि समूह एकत्र चालल्यानेच सृष्टी बनते. दोघांपैकी एकच चालल्यास व्यक्ती, समाज व सृष्टी सगळ्यांची हानी होते. मीच योग्य, इतर सगळे चुकीचे असे म्हणणे चुकीचे आहे. हा अहंकार आहे. या अहंकारानेच समाजाच्या प्रगतीत खोडा निर्माण होतो. विविध क्षेत्रातील लोक जे प्रामाणिकपणे काम करत आहेत, तोच धर्म आहे. आज विज्ञान थांबलेले का आहे, सर्व सुखसोयी असतानाही आम्ही दुखी का आहोत, याचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही. आज ब्रँडचा काळ आहे. मात्र माझा अनुभव आहे की ज्या गोष्टीचा ब्रँड तयार होतो त्याचा दर्जा खालावतो. सेवा अनेक लोक करतात. मात्र सेवा व्रत चालवणे हे प्रत्येकाला शक्य नाही. असेच सेवा व्रत माधव नेत्रालय चालवत असल्याचेही भागवत यांनी सांगितले.

राज्यभरात मोतीबिंदू अभियान राबवणार- उपमुख्यमंत्री

आपल्याकडे मोतीबिंदूची समस्या मोठी आहे. २०१६-१७ दरम्यान नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विकास महात्मे यांच्यासोबत एका प्रकल्पावर काम केले. त्यावेळी १४ लाख नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची तातडीने गरज असून न केल्यास अंधत्वाचा धोका असल्याचे पुढे आले. त्यानंतर शासकीय, धर्मादाय रुग्णालय, खासगी रुग्णालयाच्या मदतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबवले. परंतु गेली अडीच वर्षे या शस्त्रक्रिया ठप्प राहिल्याने पुन्हा मोतीबिंदूचे रुग्ण वाढले. त्यामुळे शासन सगळ्यांना सोबत घेऊन राज्यभरात मोतीबिंदू अभियान राबवणार आहे. विद्यार्थ्यांचीही तपासणी वेळोवेळी केली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Story img Loader