नागपूर : एकलव्य इंडिया फाउंडेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजू केंद्रे यांची निवड २०२४ च्या ‘इकोइंग ग्रीन फेलो’ म्हणून झाली आहे. सामाजिक नवकल्पनेच्या क्षेत्रातील एका अग्रणी नेत्याने निवडलेल्या ४४ फेलोपैकी एक म्हणून राजू केंद्रेंना ८० हजार डॉलरची शिष्यवृत्ती आणि नेतृत्व विकास मिळणार आहे. यामुळे एकलव्य इंडिया फाउंडेशनला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर कमी प्रतिनिधित्व असलेल्या समुदायातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या उच्च शिक्षण आणि नेतृत्व संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उपाय म्हणून वाढण्यास मदत होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इकोइंग ग्रीन फेलो एका आयुष्यभर टिकणाऱ्या नवकल्पनाशील विचारवंतांच्या, रणनीतिक भागीदारांच्या आणि उद्योगसमकालीन सहकाऱ्यांच्या समुदायात सामील होतात. १९८७ पासून इकोइंग ग्रीनने सुमारे एक हजार नेतृत्त्वाची निवड यासाठी केली आहे. यापूर्वी फेलोमध्ये अमेरिकेच्या माजी प्रथम महिला मिशेल ओबामा, राजकीय टीकाकार व्हॅन जोन्स, राष्ट्रीय आरोग्य चळवळ गर्लट्रेकच्या सह-संस्थापिका टी. मॉर्गन डिक्सन आणि व्हॅनेसा गॅरिसन आणि हवामान तंत्रज्ञान स्टार्टअप ब्लॉकपॉवरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डोनेल बेअर्ड यांचा समावेश आहे. २०१७ पासून, एकलव्य इंडिया फाउंडेशनने प्रेरणादायक आदर्शांच्या मदतीने जागरुकता, संपर्क, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण यावर भर दिला आहे. त्यांनी ७०० पेक्षा जास्त कार्यशाळा घेतल्या आहेत, ज्याचा लाभ लाखांहून अधिक पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना झाला आहे. त्यांच्या निवासी कार्यक्रमामुळे १७०० हून अधिक विद्यार्थ्यांना ८० पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून शिष्यवृत्ती मिळविण्यात मदत झाली आहे.

हेही वाचा – बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे अकोल्यात पडसाद; हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर

हेही वाचा – करावे तसे भरावे! प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले

एकलव्यचे ४०० माजी विद्यार्थी आता चांगल्या नोकऱ्यांमध्ये आहेत आणि त्यांच्या समुदायांना प्रेरणा देत आहेत. गेल्या सात वर्षांत संस्थेने मार्गदर्शन आणि करियर मार्गदर्शनासाठी दहा लाख तास समर्पित केले आहेत. विद्यार्थ्यांना सरकारी कार्यक्रम, ट्रस्ट आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून एकूण पाच दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त शिष्यवृत्ती मिळाली आहे. राजू केंद्रे एकलव्य इंडिया फाउंडेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. यासोबत ते उत्कट सामाजिक उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि विकास शास्त्रज्ञ देखील आहेत. भारतातील भटक्या जमाती समुदायांमध्ये शैक्षणिक असमानता आणि सामाजिक आर्थिक आव्हाने अनुभवल्यानंतर राजूने एकलव्यची स्थापना केली. मध्य भारतात एक आंतरविद्याशाखीय विद्यापीठ स्थापन करण्याची त्यांची कल्पना आहे. राजू केंद्रेंना उच्च शिक्षण आणि नेतृत्वाच्या संधी वाढविण्यासाठी निधी आणि मार्गदर्शन मिळणार आहे. याचा फायदा भारतातील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eklavaya in the modern age and the echoing green fellowship rgc 76 ssb