लोकसत्ता टीम

बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी शेगाव येथून एल्गार रथयात्राला जोशात प्रारंभ झाला. यावेळी हजारो कार्यकर्ते व शेतकरी यांच्या साक्षीने बोलताना तुपकर यांनी ही आरपारची लढाई असल्याचे सांगितले.

dcm ajit pawar warning pimpri chinchwad police over liquor sale prostitution in alandi
आळंदीतील मद्यविक्री, वेश्याव्यवसाय बंद न झाल्यास पोलिसांवर कारवाई; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
pune liquor ban ganeshotsav marathi news
मद्यविक्रीबंदीने गुन्हे कमी होणार का? मद्य विक्रेत्यांचा सवाल; पुढील वर्षी जिल्ह्यात बंदीची गणेश मंडळांची मागणी
Due to hunger strike of sugarcane growers problems of Congress leaders siddharam mhetre have increased
ऊस उत्पादकांच्या उपोषणामुळे काँग्रेस नेते म्हेत्रेंच्या अडचणीत वाढ
prarthana foundation information in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा, वृद्धांचा निवारा
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram to join Sharad Pawar faction
गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम कुटुंबातील बंडावर शिक्कामोर्तब; भाग्यश्री आत्राम १२ सप्टेंबरला…
scene of Utsav Ganeshacha aadar Stree Shakticha based on education concept of teacher Swati Deshmukh
‘उत्सव गणेशाचा आदर स्त्री शक्तीचा’ ज्यांच्या कार्यावर देखावा त्यांच्याच हस्ते उद्घाटन

आज संतनगरीत दाखल झाल्यावर तुपकरांनी एल्गार यात्रेच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. यानंतर ते सपत्नीक गजानन महाराज समाधीस्थळी नतमस्तक झाले. यानंतर रणरणत्या उन्हात यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेच्या अग्रभागी तुपकर दाम्पत्य, प्रमुख पदाधिकारी होते. यावेळी बोलताना तुपकर यांनी कापूस व सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली. अस्मानी सुलतानीचा जबर फटका बसलेले लाखो उत्पादक राजदरबारी उपेक्षित आहे. त्यामुळे सत्ताधार्यांना जागे करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे ते म्हणाले. हे आंदोलन आरपारची लढाई असल्याचे सांगून बुलढाण्यात २० नोव्हेंबर रोजी आयोजित एल्गार मोर्च्यात हजारोंच्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन तुपकरांनी केले.

आणखी वाचा-आमदार रणजीत कांबळे पुन्हा वादात, मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

असा आहे कार्यक्रम

यात्रा पहिल्या दिवशी खामगाव तालुक्यात असणार आहे. त्यानंतर मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, बुलढाणा, मोताळा मार्गे पुन्हा बुलढाणा येथे पोहचणार आहे. २० नोव्हेंबर रोजी यात्रेचा समारोप बुलढाण्यातील एल्गार मोर्च्या ने होणार आहे. सोयाबीन -कापसाला दरवाढ , येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई ,पिकविमा देण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.