बुलढाणा : ग्रामीण भागात अजूनही ‘क्रेझ’ असलेल्या कोतवाल पदासाठी जिल्ह्यात भरती प्रक्रिया सुरू आहे. यापदासाठीही परीक्षा शुल्क आकारण्यात येत असून यावर कळस म्हणजे अर्जासाठीदेखील सर्वसामान्य उमेदवारांना पैसे मोजावे लागणार आहे.

नुकतेच पार पडलेल्या तलाठी पदाच्या परिक्षेसाठी निर्धारित शुल्कावरून वादंग उठले होते. त्या शुल्कापोटी शासनाच्या तिजोरीत लाखोंची रक्कम जमा झाली. या पार्श्वभूमीवर कोतवाल पदासाठी आकारण्यात येत असलेल्या शुल्कावरून वादंग उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. २५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान उमेदवाराना अर्ज सादर करावे लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर भरावयाच्या अर्जाची किंमत २० रुपये आहे. अर्ज रद्द झाल्यास वा कोतवाल पदी निवड न झाल्यास हे परीक्षा शुल्क परत मिळणार नाही, असे शासन-प्रशासन तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या कोतवालला बऱ्यापैकी म्हणजे १५ हजार इतके मानधन मिळते. बेरोजगारीची समस्या गंभीर असल्याने व गावातच नोकरी मिळणार असल्याने या भरतीतही मोठ्या संख्येने अर्ज सादर होणार हे उघड आहे. यापरिणामी शासनाच्या तिजोरीत चांगलीच भर पडणार हे उघड आहे.

non creamy layer, UPSC , OBC , OBC Candidates job,
यूपीएससी उत्तीर्ण ओबीसी उमेदवार सरकारी अनास्थेचे बळी, हे आहे कारण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
recruitment of professors loksatta
विश्लेषण : प्राध्यापक भरतीचे होणार काय?
What is the decision of the State Board of Secondary and Higher Secondary Education regarding the directors and supervisors of teachers during examinations Nagpur news
दहावी, बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर नवीन वाद?….हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर…
maharashtra , CET, students , Applications ,
सीईटीसाठी राज्यभरातून ३ लाख ८० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज, एमबीए, एमएमएस आणि बी.एड अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
Police sub-inspector bribe, bribe, Nashik,
नाशिक : लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात
New admit cards , 12th exam, State board decision,
बारावीच्या परीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्रे, जात प्रवर्गाच्या उल्लेखावरील आक्षेपानंतर राज्य मंडळाचा निर्णय

हेही वाचा – “सरकारी शाळा उद्योगपतींना विकू नका” महिला, मुलींसह समनक पार्टीचे रास्ता रोको

हेही वाचा – “भाजपा आणि बावनकुळेंमध्ये आता दम नाही”, अंबादास दानवेंचे विधान, म्हणतात..

दृष्टिक्षेपात परीक्षा

अर्ज थेट संबधित तहसील कार्यालयात सादर करावे लागणार असून शुल्क भरल्याची पावती जोडावी लागणार आहे. ६ ऑक्टोबर अर्जाची अंतिम मुदत आहे. २२ ऑक्टोबरला परीक्षा पार पडणार असून २६ ला ‘प्रारूप निकाल’ लागणार असून उमेदवारांच्या हरकतीचे निरसन केल्यावर ३० तारखेला अंतिम निकाल लागणार आहे. परीक्षा १०० गुणांची राहणार आहे.

Story img Loader