नागपूर : महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परीक्षांसाठी तयारी करत आहेत.सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाशी झुंजवत ठेवून कुशल व अकुशल नोकऱ्यांचे बाह्यस्रोतामार्फत कंत्राटीकरण करत आहे.

अशा पद्धतीची नोकर भरती ही सुशिक्षित तरुणांचे शोषण करणारी आहे. सरकारने ही कंत्राटी नोकर भरती तात्काळ थांबवावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.लोंढे म्हणाले की, राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. तलाठी पदाच्या भरतीसाठी १४ लाख तरूणांनी अर्ज भरले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना राज्य सरकार जर कंत्राटी पद्धतीने नोकर भरत करत असेल तर हा सुशिक्षित तरुणांवरील अन्याय असून काँग्रेस पक्ष अशा नोकर भरतीचा निषेध करत आहे. या सुशिक्षित तरुणांना वेठबिगार करण्याचे शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे नियोजन आहे का, हे एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री, एक फुल दोन हाफ, यांनी स्पष्ट करावे.

Job Opportunity Recruitment Process through State Public Service Commission career news
नोकरीची संधी: राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
MPSC declared the result of Assistant Room Officer post
एमपीएससीकडून सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; अवधूर दरेकर राज्यात प्रथम
Farmers Complaints Regarding Soybean Guaranteed Price and Procurement Centre karad
सोयाबीनला हमीभाव अन् खरेदी केंद्रही नाही; शेतकऱ्यांच्या लुटीच्या तक्रारी
Maharashtra debt, Maharashtra elections,
महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात, त्यामुळे राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज – जयंत पाटील
MPSC decided to include Agriculture Service posts in Joint Preliminary Examination 2024
कृषी सेवेच्या २५८ जागांसाठी एमपीएससीकडून अर्ज प्रक्रिया सुरू… काय आहे अंतिम मुदत?
Pink e-rickshaw, Nashik, women Pink e-rickshaw nashik,
नाशिक : जिल्ह्यातील ७०० महिला गुलाबी इ रिक्षाच्या लाभार्थी
maharashtra public service Commission preliminary exam 2024 to be held on 1st December
MPSC Prelims Exam 2024 : संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची नवी तारीख जाहीर… कृषी सेवेच्या पदांचाही समावेश?  

हेही वाचा >>>सावधान! पनीर खाताय, मग ही बातमी नक्कीच वाचा…

हा सर्व प्रकार पाहता सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न पडतो. राज्य सरकारने ‘आऊटसोर्सिंग’ नोकर भरती बंद करावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष तरुणांच्या बरोबर रस्त्यावर उतरेल.उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची ही घोर फसवणूक आहे. १५ -२० हजार रुपये देऊन तरुणांची बोळवण करणार व कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा हा प्रकार आहे. सरकारने ही नोकरी भरती तातडीने बंद करुन कालबद्ध आराखडा आखून २.५ लाख रिक्त पदे भरावीत, असे लोंढे म्हणाले.