बुलढाणा: लाखो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचे जाहीर करीत, येत्या २९ नोव्हेंबरला मुंबईस्थित मंत्रालय ताब्यात घेणार असल्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली. या ‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलनासाठी राज्यभरातील हजारो शेतकरी बुलढाण्यातून मुंबईकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोमवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. मोर्चाअंती स्टेट बँक मार्गावर आयोजित जाहीर सभेत तुपकर यांनी नियोजित आंदोलनाची घोषणा केली. संध्याकाळी उशिरा पार पडलेल्या या सभेच्या व्यासपीठावर राज्यातील शेतकरी नेते, पदाधिकारी हजर होते.

Controversy arose after Dahanu Deputy Registrar registered deposit agreement for BJP office bearers land purchase
डहाणूत जमीन घोटाळा, भाजपच्या पदाधिका-याकडून वर्ग दोनच्या जमिनीवर साठेकरार व कुलमुखत्यार पत्राची बेकायदा नोंदणी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Mallikarjun Kharge Dubki Remark
Mallikarjun Kharge : “गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी…”, मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून नवा वाद; भाजपाने दिलं प्रत्युत्तर
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
BJP MLA and state Textiles Minister Sanjay Savkare appointed as Guardian Minister of Bhandara
भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला पुन्हा ‘पार्सल’ पालकमंत्री; परंपरा कायम

हेही वाचा… अकोला: दोन गटात वाद; किरकोळ कारणावरून तुरळक दगडफेक, तणावपूर्ण शांतता

शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहणार आहे. सोयाबीनला ९ हजार आणि कापसाला किमान १२ हजार रुपये दर मिळावा, बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला. सरकारने सात दिवसांत या मागण्यांची पूर्तता केली नाही तर २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेणार आहोत. हिंमत असेल तर सरकारने माझ्यासह शेतकऱ्यांना यापासून रोखून दाखवावे, असे आवाहनही तुपकर यांनी राज्य सरकारला दिले.

तत्पूर्वी, जिजामाता क्रीडा व व्यापार संकुल येथून निघालेल्या एल्गार मोर्चात तुपकरांसह शेतकरी नेते, पदाधिकारी-कार्यकर्ते व जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जयस्तंभ परिसर, बाजारपेठ, असे मार्गक्रमण करून हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मागील आंदोलनात झालेला संघर्ष आणि पोलिसांनी केलेला लाठीमार लक्षात घेता यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिजामाता संकुल, जिल्हाधिकारी परिसर आणि मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते.

Story img Loader