राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात वध्रेतील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आत्मक्लेश आंदोलन अखेर तात्पुरते संपले. तात्पुरते यासाठी की, फसवणूक झालेल्या या शेतकऱ्यांना सरकार खरोखरच पैसे देऊ शकेल काय, या प्रश्नाचे उत्तर अजून अस्पष्ट आहे. सध्या सरकारने लेखी आश्वासन देत संघाची होणारी बदनामी थांबवली, पण पैसे देताना ते कसे द्यायचे, यावर सरकारी पातळीवरच संभ्रमावस्था आहे. खरे तर, वध्रेजवळच्या सेलूतील या शेतकऱ्यांची झालेली फसवणूक हा एका व्यापाऱ्याकडून झालेली लुबाडणूक, एवढाच मुद्दा होता. सेलू गावात जिनिंगचा व्यवसाय करणाऱ्या सुनील टालाटुले या व्यापाऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या शेतकऱ्यांकडून कापूसखरेदी केली. गेली अनेक वष्रे तो ही खरेदी करायचा व शेतकऱ्यांना पैसेही द्यायचा. गेल्या वर्षी त्याने ते दिले नाहीत. ८ कोटींची ही रक्कम शेतकरी मागायला गेले, तर राज्यात व केंद्रात आमचे सरकार आहे. माझे वडील संघाचे पदाधिकारी आहेत. पैसे दिले नाही, तर काय कराल?, अशी भाषा वापरल्याने वाद सुरू झाला. पैशासाठी वणवणणारे हे शेतकरी बाजार समितीत गेले तेव्हा समितीने या व्यापाऱ्याला खरेदीसाठी अधिकृतच केले नव्हते, असे लक्षात आले. शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्याने समितीच्या नावाने दिलेल्या पावत्या दाखवल्या. तरीही समितीने हात वर केले. शेतकरी पोलिसात गेले. तेथे गुन्हा दाखल झाला व हा व्यापारी फरार झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा