वाशीम : आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हळद उत्पादक शेतकरी अडचणीत असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या हळदीला अत्यल्प दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केले. शेजारील हिंगोली जिल्ह्यात हळदीला ७३०० रुपये दर असताना वाशीममध्ये केवळ ५७०० रुपये दर का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करून सरकारचा निषेध व्यक्त केला.

एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव जाहीर करते, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भावाने मालाची विक्री करावी लागत आहे. हळदीला चांगले दर मिळतील या आशेने वाशीम बाजार समितीमध्ये केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातून जवळपास तीन ते साडेतीन हजार क्विंटल हळद विक्रीस आलेली होती. मात्र, हळदीला केवळ ५ हजार ७०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती.

parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
More than 17 deaths in two years at ammunition company
दारुगोळा कंपनीत दोन वर्षांत १७ हून अधिक बळी… भंडारातील घटनेमुळे…
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
Cotton production, Cotton bales, textile industry,
कापूस उत्पादन ३०४ लाख गाठींवर जाणार, कापड उद्योगाला मोठा दिलासा; जाणून घ्या कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाचा अंदाज
kolhapur tamdalge village ropvatika
लोकशिवार : रोपवाटिकेचे गाव!

हेही वाचा – नितीन गडकरींचे सहकुटुंब देवदर्शन; भक्तांसाठीही सहकार्याचा हात

पोलीस प्रशासन व बाजार समितीच्या वतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला ७३०० रुपये दर, रिसोड व इतर बाजार समित्यांमध्ये चांगले दर असताना वाशीम बाजार समितीमध्ये दर कमी का? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकरी ठाम होते. यामुळे लिलाव प्रक्रिया बंद करण्यात आली. सकाळपासूनच शेतकरी उपाशी पोटी आपला माल घेऊन बाजार समित्यांमध्ये आले असून, बाजार समित्यांमध्ये मात्र शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

शेतकऱ्याला सापत्न वागणूक का?

येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची हळद उघड्यावर तर व्यापाऱ्यांची ओट्यावर होती. उघड्यावर हळद असल्याने उन्हामुळे हळदीला अत्यल्प दर मिळतो. त्यामुळे व्यापाऱ्यांचा ओट्यावर असलेला माल खाली करावा व शेतकऱ्यांचा माल ओट्यावर ठेवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

हेही वाचा – चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आठवड्यातील दुसरी घटना, शेतकऱ्यांमध्ये दहशत

शेतकऱ्याच्या नावाने मते मागणारे नेते कुठे?

अनेक नेते शेतकऱ्यांच्या नावाने केवळ राजकारण करतात. मात्र येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असता, यावेळी जिल्ह्यातील कुठलाच नेता, लोकप्रतिनिधी आला नसल्याने शेतकऱ्यांनी नेत्यांवर तीव्र रोष व्यक्त करून जय जवान, जय किसानच्या घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

Story img Loader