अकोला: अतिवृष्टीमुळे पीक विमा काढण्यात शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पीक विमा काढण्याच्या मुदतीला २० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत एक रुपयांमध्ये पीक विमा योजना सुरू केली. पंचामृत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र, आता पीक विमा काढण्यात शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा मोसमी पावसाचे उशिराने आगमन झाले. त्यातच आता अतिवृष्टी झाली. पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत नोंदणीची मुदत जाहीर केली आहे.

gjc efforts to implement one nation one gold rate across the country
देशभर सर्वत्र सोन्याच्या एकसमान दरासाठी प्रयत्न
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Baba Siddique Murder Case :
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात एका भंगार विक्रेत्याला अटक; शूटर्सना पुरवायचा शस्त्र, आतापर्यंत १० आरोपींना अटक
Discrimination by Mumbai Municipal Corporation,
वैद्यकीय विमा योजनेत मुंबई महापालिकेची सापत्न वागणूक, खर्चावरील मर्यादा निश्चितीमुळे कर्मचारी नाराज
20 people cheated, 20 people cheated,
रेल्वेत कारकून पदभरती करतो असे सांगून सव्वाकोटी रुपयांची २० जणांची फसवणूक
mukhyamantri mazi ladki bahin yojana extended apply date
महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज!
800 cases of dengue and 600 cases of winter fever were found in the state of Maharashtra in 10 days Mumbai print news
राज्यात १० दिवसांत आढळले डेंग्यूचे ८००, तर हिवतापाचे ६०० रुग्ण
Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव

हेही वाचा… मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळाले; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रशासनात खळबळ

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. वायर तुटल्याने इंटरनेट सुविधा बंद आहे. काही ग्रामीण भागात विद्युत पुरवठा देखील खंडित झाला. अतिवृष्टीमुळे विविध तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन पीक विमा काढण्याचे कार्य ठप्प झाले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. असंख्य शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित आहेत. शेतकरी संकटात असल्यामुळे शासनाने या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून ऑनलाइन पीक विमा काढण्यात २० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार सावरकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.