बुलढाणा : राज्यातील लाखो शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटाने कोलमडून गेले. अवकाळी, गारपीट, प्रचंड नुकसान, पिकांना कवडीमोल भाव यामुळे बळीराजा चहुबाजूंनी संकटात सापडला आहे. अशा बिकट परिस्थितीत त्यांना मदत करण्याऐवजी राज्यकर्ते यात्रेवर गेले, अशी टीका ठाकरे गटाचे पश्चिम विदर्भ संपर्क नेते खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. आता खऱ्या अर्थाने लोकशाही बचाव यात्रा काढण्याची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

चिखली येथील स्वरांजली लॉन येथे सोमवारी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. व्यासपीठावर जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, महिला आघाडी जिल्हा संघटिका जिजा राठोड, युवासेना जिल्हा प्रमुख नंदु कऱ्हाडे, प्रा. सदानंद माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी खा. सावंत यांनी पक्ष संघटना, शाखा स्थापना, आदी विषयांवर मार्गदर्शन केले. याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकत सरकारवर टीका केली.

sharad pawar marathi news
“केंद्रातील सरकार शेतकरीविरोधी”, शरद पवार यांची शिंदखेड्यातील मेळाव्यात टीका
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
minister dharmarao baba atram face double challenge in aheri assembly constituency
कारण राजकारण : मुलीच्या बंडामुळे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासमोर दुहेरी आव्हान !
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Aaditya Thackeray
Aditya Thackeray : “ही निवडणूक आहे, लढाई नाही, त्यामुळे राजकीय पक्षांनी…”; छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!

हेही वाचा – यवतमाळ: कारमधून आले अन् चाकूचा धाक दाखवून २५ टन साखरेचा ट्रकच घेऊन गेले…

हेही वाचा – “संजय राऊत यांचं डोकं फिरलंय!”, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची टीका; म्हणाले, “प्रभू रामचंद्र त्यांना..”

गावागावात जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देत शिवसैनिकांनी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे आवाहन खा. सावंत यांनी केले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करून शिवसैनिकांनी संघटनात्मक बांधणी घट्ट करावी, असेही ते म्हणाले.