लोकसत्ता टीम

वर्धा : शेतमालाला योग्य भाव मिळावे, ही मागणी सातत्याने होते. अगदी २५ वर्षांपूर्वी शरद जोशी यांनी, “भिक नको, हवे घामाचे दाम” म्हणत रान पेटविले होते. आजही तेच दुःख असल्याची भावना आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून आली. कापूस घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना पडलेले भाव मिळत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

DJ ban order, Ganesh utsav, High Court mumbai,
डीजे बंदीचा आदेश गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही, तो सगळ्याच मिरवणुकांना लागू – उच्च न्यायलयाची स्पष्टोक्ती
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
anganwadi workers 500 crores marathi news
अंगणवाड्यांमध्ये ५०० कोटींच्या छत्र्या, मेगाफोन खरेदीचा घाट
over 120 hospitalised after food poisoning on janmashtami in mathura
जन्माष्टमीच्या प्रसादातून विषबाधा; मथुरेतील घटना, १२०हून भाविक रुग्णालयात दाखल
Uran rain, Uran farmers Relief, rice crops Uran,
उरण : जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा, भात पिकांवरील रोगाचा प्रतिबंध होण्यास मदत

प्रहार सोशल फोरमचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात शेतकरी बंधूंनी उभा कापूस पेटवून दिला. प्रतिक्विंटल दहा हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले होते. दुप्पट तर सोडाच पण लागवड खर्चही निघत नाही. चार वर्षापूर्वी जो भाव मिळत होता, तेवढाही आता मिळत नाही. त्या तुलनेत खते, किटनाशक याचे भाव गगनाला भिडले आहे. सोयाबीन सात हजार रुपये क्विंटल होते ते आता साडेचार हजार भावाने विकावे लागत आहे. केंद्राने राज्यांना जे हमी भाव पाठविले ते सुद्धा मिळू शकत नाही. मग दुप्पट हमीची शेखी कशी मिरविता, असा सवाल जगताप यांनी केला.

आणखी वाचा-अमरावती : दहा दुकानांमध्‍ये चोरी करून ‘ते’ पाहत होते सिनेमा; पोलिसांनी चित्रपटगृहातच…

कापसाला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळालाच पाहिजे, तरच दोन पैसे पदरात पडतील. आज मिळणाऱ्या भावाने लागवड खर्चही निघत नाही. एकीकडे निसर्ग तर दुसरीकडे सरकार झोडपत आहे. हे लुटीचे धोरण बंद झाले पाहिजे. आज आम्ही आमचाच कापूस पेटवित आहे. जर धोरणात बदल झाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलन झाल्यावर आर्वी उपविभागीय अधिकारी यांना पंतप्रधान मोदी यांच्या नावे मागणीचे निवेदन देण्यात आले.