नागपूर : लग्न सोहळा आटोपला आणि सायंकाळी परतीचा प्रवास सुरू झाला. ट्रॅक्टरवर निघालेल्या वऱ्हाड्यांचा हा शेवटचा प्रवास ठरला. नागपूरजवळील कन्हान रेल्वे क्रॉसिंगवर घडलेल्या भीषण अपघातात तब्बल ५८ जणांचा मृत्यू झाला. २० वर्षांपूर्वी घडलेल्या या भीषण अपघातातील नातेवाईकांना काचुरवाहीच्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

कन्हान-कांद्री येथील जयदुर्गा मंगल कार्यालयात ३ फेब्रुवारी २००५ रोजी लग्न समारंभ होता. या विवाह सोहळ्यासाठी काचुरवाहीचे गावकरी ट्रॅक्टरने आले होते. त्यांच्या गावातील बळीराम नाटकर यांचा मुलगा नरेशचा विवाह कांद्रीच्या गंगाधर सरोदे यांची कन्या शुभांगीशी होणार होता. काचुरवाहीचे गावकरी ७ ते ८ ट्रॅक्टरने वरात घेऊन आले होते. कन्हान येथील सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी ३ फेब्रुवारी रोजी कन्हानच्या त्या अपघातस्थळी मृतांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेत असतात. यंदाही सत्यकार व दयाराम भोयर यांनी पुढाकार घेऊन त्या मृतकांना श्रद्धांजली अर्पण केली. गावकऱ्यांनी फुले वाहून तसेच मेणबत्त्या लावून आपल्या आप्तांचे स्मरण केले.

deformed youth who came to fix shutters of shop near school molested 17 school girls
नागपूर:विकृतपणाचा कळस , १७ शाळकरी मुलींशी चाळे
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
nagpur youth saved lives of 150 people by talking to american soldiers and presenting truth
नागपूरकर युवकामुळे वाचले १५० जणांचे प्राण, अमेरिकेतून सुटका झालेल्या तरुणाने सांगितला थरार
12 shops were broken into in one night amateur robbers managed to cover cameras
एका रात्रीत १२ दुकाने फोडली, शौकीन दरोडेखोरांनी कॅमेरे झाकून साधला डाव
Chief Minister Devendra Fadnavis launches complaint redressal helpline
नागरी सुविधांबाबत तक्रारी आहेत, या क्रमांकावर नोंदवा
Nagpur sweets, Consumers looted by sweets sellers,
सावधान! दिवाळीत मिठाई विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत
nagpur boeing companys project to convert passenger planes into cargo planes
नागपुरात मालवाहू विमानांची निर्मिती

लग्न सोहळा आटोपला आणि सायंकाळी परतीचा प्रवास सुरू झाला. त्यावेळी कन्हान रेल्वे क्रॉसिंगवर (नागपूर-हावडा मार्ग) फाटक नव्हते. ट्रॅक्टर या मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवरून वऱ्हाड्यांना घेऊन जात होते. त्याचवेळी रामटेकवरून नागपूरकडे जाणारी रेल्वेगाडी भरधाव येत होती. इंजिन काही सेकंदात ट्रॅक्टरला धडकले आणि ट्रॉलीत बसलेले हवेत फेकले गेले. एकच आकांत झाला. काय झाले कोणालाच काही कळत नव्हते. लग्न मंडपातील लोकांनीही तिकडे धाव घेतली. आजुबाजूच्या परिसरात माणसांचे मृतदेह, कुठे हात, कुठे पाय पडले होते. रक्ताचा आणि हाडामांसाचा सडा काय असतो ते तेथे दिसत होते. भरधाव इंजिनने तब्बल ५८ जणांचा बळी घेतला होता.

अपघाताचे वृत्त कळताच काचुरवाही शोकसागरात बुडाले. कोणाचे सांत्वन कुणी करायचे, अशी स्थिती होती. त्या सायंकाळी कुणाचीच चूल पेटली नाही. सर्व ५८ जणांचा तिसरा दिवस सामूहिक करण्यात आला होता. ३ फेब्रुवारी २०२५ पुन्हा गावकरी एकत्र आले आणि घटना स्थळी या २० वर्षांपूर्वी घडलेल्या या भीषण अपतातील नातेवाईकांना काचुरवाहीच्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली. सत्यकार व दयाराम भोयर यांनी पुढाकार घेऊन त्या मृतकांना श्रद्धांजली अर्पण केली. गावकऱ्यांनी फुले वाहून तसेच मेणबत्त्या लावून आपल्या आप्तांचे स्मरण केले. आता येथे रेल्वे क्रॉसिंग नाही. त्या ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल बांधण्यात आला आहे.

Story img Loader