अमरावती : बेलोरा येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात असून प्रवासी विमानसेवा सुरू होण्यासाठी येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व तांत्रिक कामे पूर्ण करण्याचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा (एमएडीसी) प्रयत्‍न असला, तरी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या चमूच्या पाहणीनंतरच ‘अलायन्स एअर’ कंपनीच्या विमानांना उड्डाणाची परवानगी मिळू शकेल, असे चित्र आहे.

अमरावती विमानतळावरून ‘अलायन्स एअर’कडून विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

11869 flights landed at nagpur international airport in 2024
बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ उपराजधानीत १२ महिन्यात ११ हजार ८६९ विमाने उतरली
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mahakumbh, Airline companies , fares ,
‘महाकुंभ’साठीच्या दर ‘भरारी’चे नियंत्रण करण्याची मागणी, विमान कंपन्यांच्या भाडेवाढीविरुद्ध ग्राहक पंचायत आक्रमक
Pune Prayagraj Air Flight , Pune Prayagraj ,
पुणे प्रयगराज हवाई उड्डाण थेट नाहीच, प्रवाशांची नाराजी
‘एनव्हीएस-०२’चे आज उड्डाण
Kailash Mansarovar Yatra
Kailash Mansarovar Yatra : कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार! थेट विमानसेवाही पूर्ववत होणार
Mahakumbh Mela 2025 Flights Rates
Maha Kumbh 2025 : महाकुंभला जाण्यासाठी विमान तिकिटे स्वस्त होणार? उड्डाण मंत्रालयाची पावले; विमान कंपन्यांना दिल्या सूचना!
Air India passengers create ruckus after got stranded in Mumbai-Dubai flight
Air Indiaच्या विमानात ५ तास अडकून पडले प्रवासी, खाली उतरवण्यासाठी घातला गोंधळ; व्हायरल होतोय Video

अमरावती विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम विविध कारणांमुळे रखडत गेले. बेलोरा येथील विमानतळावर १३०० मीटरची धावपट्टी होती. ‘एटीआर-७२’सारख्या विमानांना उतरणे सोयीचे व्हावे, यासाठी ही धावपट्टी १८५० मीटरपर्यंत वाढवण्याचे नियोजन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने केले. दुसरीकडे, ‘टर्मिनल बिल्डिंग’वर अखेरचा हात फिरवला जात आहे. ‘एटीसी टॉवर’ची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. सर्व तांत्रिक कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा ‘एमएडीसी’चा प्रयत्न आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा…तोंडावर ॲसिड फेकून तुझे आयुष्यच खराब करतो….बलात्कार पीडितेला रस्त्यात गाठून….

विमानतळाची पाहणी करण्यासाठी ‘डीजीसीए’चे पथक पुढील आठवड्यात येत आहे. त्यानंतर बेलोरा विमानतळावर उड्डाणे सुरू करण्यासाठी ‘डीजीसीए’ आणि ‘ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी’कडून परवाना मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अमरावतीही देशाच्या हवाई नकाशावर येईल.

बेलोरा येथील विमानतळाची धावपट्टी ही १९९२ मध्ये उभारण्यात आली होती. सध्या या धावपट्टीचा वापर केवळ खासगी विमानांसाठी होतो. राज्य सरकारने २००९ मध्ये ‘एमएडीसी’ला बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी विशेष उद्देश कंपनी म्हणून नियुक्त केले होते आणि २८० कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरीदेखील देण्यात आली होती. पण, हे काम रखडले. ‘एटीआर-७२’ प्रकारातील विमानाचे उड्डाण करण्यासाठी रात्रकालीन विमान उड्डाणाच्या सुविधेसह धावपट्टीची लांबी १३७२ मीटरवरून १८५० मीटपर्यंत वाढवणे व इतर कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला. परंतु हे काम शेवटच्या टप्प्यात पुन्हा रखडले होते. ते आता पूर्णत्वास जात आहे.

हेही वाचा…अशी ही बनवाबनवी! विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणाऱ्या महिलेला दिल्लीतून अटक

वाहतूक सर्वेक्षण पूर्ण

अमरावतीहून ‘अलायन्स एअर’ची ‘एटीआर-७२’ ही विमानसेवा सुरू होणार आहे. यासाठी ‘अलायन्स एअर’कडून हवाई वाहतूक सर्वेक्षणही करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अमरावती विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व तांत्रिक कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. विमानसेवेसाठी अलायन्स एअर या कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात डीजीसीएची चमू विमानतळाची पाहणी करणार आहे. – गौरव उपश्याम, विमानतळ व्यवस्थापक, अमरावती.

Story img Loader