नागपूर : नोंदीत कामगारांना राज्य शासनाच्या कामगार विभागाने जाहीर केलेल्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्य विषयक योजनांचे लाभ थेट लाभ हस्तांतरण (डिबिटी) पद्धतीने देण्यात येतात. यानुसार कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य देण्यात येते. जानेवारी ते डिसेंबर २०२४ इयत्ता ७वी पर्यंतच्या शिक्षणासाठी, इयत्ता ८वी ते १०वी साठी, ११वी व १२वीतील पाल्यांना शैक्षणिक सहाय्य आणि १० व १२ वी उत्तीर्ण पाल्यांना प्रोत्साहन राशी स्वरूपात १७ कोटी ७२ लाख ७६ हजार रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार नियम, २००७ अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. राज्यभरातील कामगार कार्यालयांमार्फत या मंडळाच्यामाध्यमातून कामगारांची नोंदणी करण्यात येते व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ पुरविण्यात येतात. नोंदीत कामगारांना कामगार विभागाने जाहीर केलेल्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्य विषयक योजनांचे लाभ थेट डिबिटी पद्धतीने देण्यात येतात. तसेच कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तू संच वितरीत करण्यात येतात.
नागपूर विभागात २३ हजारांवर कामगारांच्या पाल्यांना ८ कोटींपेक्षा जास्त कामगारांना शैक्षणिक सहाय्यांतर्गत त्यांच्या दोन पाल्यांना शाळेतील किमान ७५ टक्के किंवा अधिक उपस्थिती असणाऱ्या इयत्ता १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी २ हजार ५०० रुपये तर ८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी ६ हजार रुपये शैक्षणिक अर्थ सहाय्य देण्यात येते. या योजनेंतर्गत नागपूर विभागात २३ हजार ६३२ कामगारांच्या पाल्यांना ८ कोटी ३५ लाख ५६ हजार रुपयांचे शैक्षणिक सहाय्य देण्यात आले. या योजनेंतर्गत विभागात सर्वाधिक ११ हजार ६८१ लाभार्थी वर्धा जिल्ह्यातील असून त्यांना ४ कोटी २० लाख ४५ हजार रुपयांचे शैक्षणिक सहाय्य प्रदान करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील ७ हजार २८१ लाभार्थ्यांना २ कोटी ५३ लाख ५० हजार रुपयांचे, भंडारा जिल्ह्यातील ३३७ लाभार्थ्यांना ११ लाख ३२ हजार ५०० रुपयांचे, गोदिंया जिल्ह्यातील १ हजार ९५९ लाभार्थ्यांना ६९ लाख ६० हजार रुपयांचे, चंद्रपूर जिल्ह्यातील १९६ लाभार्थ्यांना ६ लाख ९० हजार रुपयांचे आणि गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार १७८ लाभार्थ्यांना ७३ लाख ८७ हजार ५०० रुपयांचे शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात आले.
कामगारांच्या इयत्ता 11 वी व 12 वीतील पाल्यांच्या शिक्षणासाठी 7 कोटींच्यावर शैक्षणिक सहाय्य तर इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण पाल्यांना 2 कोटीं पेक्षा जास्त प्रोत्साहन सहाय्य प्रदान करण्यात आले.
कामगारांच्या दोन पाल्यांना
इयत्ता 10 वी व 12 मध्ये किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास १० हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य देण्यात येते. विभागातील कामगारांच्या २ हजार १७९ पाल्यांना २ कोटी १७ लाख ९० हजार रुपयांचे प्रोत्साहन शैक्षणिक सहाय्य देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील ३९८ लाभार्थ्यांना ३९ लाख ८० हजार रुपयांचे प्रोत्साहन शैक्षणिक सहाय्य देण्यात आले.