यवतमाळ : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. आता गावगावांत वेदनांचा पूर आला असून, संसार सावरण्याचे आव्हान पूरग्रस्तांसमोर निर्माण झाले आहे. शासनाची पाच हजारांची मदत तोकडी ठरत आहे. पूरग्रस्त गावांमध्ये नेते, अधिकाऱ्यांचे पाहणी फोटोसेशन संपल्यानंतर पीडित प्रत्यक्ष मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

शुक्रवारी रात्री आलेला पूर ओसरला असला तरी त्या रात्रीच्या काळ्याकुट्ट आठवणी अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. घरातील भांडीकुंडी वाहून गेली. अंगावर कपडे तितके शिल्लक आहेत. घरातील गाळ साफ करताना पीडितांची तारांबळ उडते आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी गावातील रस्त्यावरून थेट घरात शिरले. जिवाच्या आकांताने नागरिकांना घराच्या छतावर आसरा घ्यावा लागला. महागाव तालुक्यातील अनंतवाडीसह, यवतमाळ, केळापूर, घाटंजी, दारव्हा, दिग्रस आदी तालुक्यांना चांगलाच फटका बसला.

gjc efforts to implement one nation one gold rate across the country
देशभर सर्वत्र सोन्याच्या एकसमान दरासाठी प्रयत्न
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Father and son imprisonment, imprisonment beat police,
मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
Baba Siddiqui murder case, Baba Siddiqui,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही
Loksatta explained Why are political leaders killed Apart from politics there are other reasons behind the murder
राजकीय नेत्यांच्या हत्या का होतात? हत्येमागे अनेकदा राजकारण वगळता ‘अन्य’ कारणेच?
slum Dharavi, House slum dwellers Dharavi,
धारावीतील सर्व अपात्र झोपडीवासीयांना घरे! शासनाकडून धोरण जाहीर
Balasaheb Thorat phone call, Sudhir Mungantiwar,
थोरात यांचा थेट वनमंत्र्यांना फोन… वनमंत्र्यांनी दिले बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश! नेमके काय घडले?
devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश

हेही वाचा >>> चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून सहा ठार, नऊ जखमी; वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी

अतिवृष्टीमुळे तब्बल २५४ गावे बाधित झाली. ६०० वर कुटुंबांना स्थलांतरीत करावे लागले. यात एक हजार ४७२ घरांची अंशत: तर २७५ घरांची पूर्णत: पडझड झाली. पुराच्या पाण्यात घरातील भांडीकुंडी, किराणा साहित्य, मुलांचे पुस्तके, शासकीय कागदपत्रे वाहून गेली. घरातील साहित्य पुरात वाहून जात असताना पीडितांना केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागली. स्वत:सह मुलांचा जीव वाचविण्यासाठी सुरक्षित जागेचा आधार शोधावा लागला. आता पूर ओसरल्यावर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, घरात चिखलाशिवाय काहीच दिसत नाही. चिखल काढताना पीडितांच्या डोळ्यातील पूर काही केल्या थांबताना दिसत नाही. मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागात दौरे करून पीडितांना मदतीचे आश्‍वासन दिले. मात्र, त्यातून समाधानाशिवाय पीडितांना काहीही मिळाले नाही.

हेही वाचा >>> बुलढाणा: मटन मार्केटला आग, लाखोंचे नुकसान; मेहकरमध्ये खळबळ

दरम्यान, आश्वासनानंतरही हाती काहीच न आल्याने वाघाडी येथील पूरग्रस्त नागरिक आज, बुधवारी रस्त्यावर उतरले.

शेतकऱ्यांच्या स्वप्नांची धूळधाण

अतिवृष्टीच्या पावसात नदी-नाल्यांचे पाणी थेट शेतात शिरले. त्यामुळे पाण्याच्या लोंढ्यात शेती खरडून गेली. हजारो हेक्टर क्षेत्रात कुठेही पीक शिल्लक नाही. शेतीची विदारक अवस्था झाल्याने शेतकऱ्यांत त्राणही उरला नाही. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी लावलेले कापूस, सोयाबीन, तूर कुठेही दिसत नाही. या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचीच धूळधाण केली. त्यामुळे मुलांचे शिक्षण, आजारपण, उदरनिर्वाह, आदी प्रश्‍नांनी शेतकरी चिंताग्रस्त आहे.