यवतमाळ – नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या शुक्रवारी सिंदखेडराजा (बुलढाणा) येथे भीषण अपघातानंतर बस जळाल्याने किमान २५ प्रवासी आगीत होरपळून मृत्युमुखी पडले.

मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्यानंतरही येथील विदर्भ ट्रॅव्हल्सचे कार्यालय सकाळी बंद होते. त्यामुळे येथे माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. ट्रॅव्हल्स संचालक दरणे हे सकाळीच घटनास्थळी रवाना झाले.

road accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ठाणे, भिवंडी कोंडले
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Metro service for cricket fans in Nagpur till 11.30 pm on 6th february
नागपूरच्या क्रिकेट रसिकांसाठी मेट्रोची सेवा रात्री ११.३० पर्यंत
is the police protecting reckless drivers
बेदरकार वाहनचालकांना पोलिसांचे अभय?
Murder in anger over being chased on a bike Kharghar crime news
दुचाकीवर हुलकावणी दिल्याच्या रागातून खून; खारघरमधील घटना
Development works worth one thousand crores will be done in Nagpur says chandrashekhar bawankule
उपराजधानीत एक हजार कोटींची विकासकामे होणार; कारागृह, बसस्थानकांसह…
Eyewitnesses said they could hear sounds of workers buried under rubble after explosion in bhandara
स्फोटानंतर एक तास मलब्या खाली दबलेल्या लोकांचे येत होते आवाज… ‘मला बाहेर काढा…’
Shocking video of accident Mother daughter fell down due to overspeed bus viral video on social media
आता तर हद्दच झाली! माय-लेकीबरोबर रस्त्यात घडली दुर्घटना, भरवेगात बस आली अन्…, थरारक VIDEO व्हायरल

हेही वाचा – Buldhana Accident: नागपूरचे प्रवासी कुठे राहतात याची अजुनही माहिती नाही, आठ तास होऊनही बुकिंग ऑफिस बंद

विदर्भ ट्रॅव्हल्स यवतमाळ येथील दरणे बंधू यांच्या मालकीची आहे. नागपूर, यवतमाळ येथून पुणे, मुंबई येथे प्रवासी सेवा देतात. विदर्भ ट्रॅव्हल्स (क्र. एमएच २९, बीई १८१९) बसमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांची माहिती ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्राप्त झाली. त्यात रामदास पोकळे, करण बुधवावरे, वृषाली वनकर, इशांत गुप्ता, शृजान, मेघना तायडे, तेजू राऊत, कैलास गंगावणे, संजीवनी घोटे, कौस्तुभ काळे, सुशील केळकर, गुडीया शेख, राजश्री, योगेश गवई, राधिका खडसे, प्रथमेश खोडे, अवंती पाडणेकर, निखील पाठे, शशिकांत गजभिये, आयुष गाडगे हे प्रवास करत असल्याचे पुढे आले.

प्रवासी ट्रॅव्हल्सचे तिकीट बुकींग करताना कंपन्या अर्धवट माहिती फिड करतात, हे या अपघातामुळे पुढे आले. कंपनीच्या वतीने सकाळी जाहीर करण्यात आलेल्या यादीत प्रवाशांची केवळ पहिली नावे व फोन नंबर होते. त्यातील अनेक फोन बंद असल्याचे आढळले. पूर्ण पत्ता, अपघात झाल्यास अन्य संपर्क क्रमांक आदी कशाचीही नोंद ट्रॅव्हल्स कंपन्या ठेवत नसल्याचे आढळले. यावर प्रादेशिक परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.

हेही वाचा – समृद्धी अपघात : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घटनास्थळाला भेट देणार

अपघात झाल्यानंतर काही दिवस प्रादेशिक परिवहन विभाग कारवाईचा फार्स करतात आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे होते, हेही पुढे आले. विदर्भ ट्रॅव्हल्सची नागपूरहून पुण्याकडे जाणारी ही बस नवीकोरी असल्याचे संचालक विरेंद्र दरणे यांनी सांगितले. गाडीची सर्व कागदपत्रे व वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्रही परिपूर्ण असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघाताची पुनरावृत्ती

आठ महिन्यांपूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये यवतमाळच्या चिंतामणी ट्रॅव्हल्सचा नाशिकनजीक अपघात होऊन १२ प्रवाशांचा जळून कोळसा झाला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघाताने झाली. वर्षभराच्या आत लागोपाठ झालेल्या या अपघातांच्या घटनांनी यवतमाळच्या ट्रॅव्हल्स विश्वावर शोककळा पसरली आहे.

Story img Loader