दोन दशकापूर्वीपर्यंत अगदी सरकारी पातळीवर सुद्धा वनखाते कुणाच्या खिजगणतीतही नसायचे. नवे सरकार स्थापन झाल्यावर राजकारण्यांमध्ये मलईदार खात्यासाठी चढाओढ तशी नेहमीचीच. त्यातही याचा समावेश कधी नसायचा. त्यामुळे मलईच्या मागे न धावणाऱ्या व राजकीय स्पर्धेत फारसे चर्चेत नसणाऱ्यांना हे खाते देऊन बोळवण केली जायची. पर्यावरणाचा ऱ्हास, झपाट्याने कमी होत जाणारे जंगल, वन्यप्राण्यांची शिकार, वाघांचे नष्ट होत जाणे, हवामान बदल व त्याचा होणारा परिणाम हे मुद्दे अग्रक्रमावर येऊ लागले तसे अनेकांचे या खात्याकडे लक्ष जाऊ लागले. अलीकडच्या काळात तर वनकायद्यामुळे होणारी विकासकामांची अडवणूक व वाघांची संख्या वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्षात झालेली वाढ यामुळे हे खाते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहात आलेले. एरवी सर्वच पातळीवर दुर्लक्षित अशा या खात्याला आकर्षणाचे केंद्र बनवले ते सुधीर मुनगंटीवारांनी. त्यांनी सलग साडेसात वर्षे हे खाते अत्यंत यशस्वीपणे सांभाळले. मधली अडीच वर्षे ते संजय राठोडांकडे होते. त्यांचा कार्यकाळ केवळ घाऊक बदल्यांनी गाजला. आता ही जबाबदारी आली ती गणेश नाईकांकडे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा